शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना वेठीस धरू नका

By admin | Updated: June 6, 2017 05:37 IST

आंदोलन आणि संपाच्या नावाखाली शेतक-यांना वेठीस धरण्याचे पाप विरोधी पक्ष करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आंदोलन आणि संपाच्या नावाखाली शेतक-यांना वेठीस धरण्याचे पाप विरोधी पक्ष करीत आहेत. अशाप्रकारे शेतक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात असणा-या विरोधकांना शेतकरीच त्यांची खरी जागा दाखवून देतील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांचा समाचार घेतला. एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या नव्या शीतपेयाचे अनावरण सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतल्यानंतरही शेतक-यांनाच वेठीस धरण्याचे पाप विरोधक करत आहेत , असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतक-याला योग्य भाव आणि बाजार मिळणे विविध परिस्थितीवर अवलंबून असते. अशा बेभरवशाच्या बाजारातून शेतक-याची सुटका करायची असेल तर प्रक्रीया उद्योगावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रक्रिया उद्योगांसाठीचे धोरणही बनविले आहे. फलोत्पादन आणि प्रक्रीयाउद्योग हेच शेतक-यांचा प्रश्नांचे उत्तर असून त्यासाठी राज्य सरकारने प्रक्रीया उद्योगांची उभारणी, गोदाम, शीतगृहांच्या बांधणीचे काम हाती घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.