शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

सर्व दुकानांवर सरसकट बंदी घालू नका

By admin | Updated: June 13, 2017 01:32 IST

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात असलेल्या सर्व दारूविक्री दुकानांवर सरसकट बंदी घातली जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रत्येक

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात असलेल्या सर्व दारूविक्री दुकानांवर सरसकट बंदी घातली जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रत्येक दुकान मालकाचे म्हणणे ऐकून योग्य ते आदेश देण्यास सांगितले.दारूविक्री न करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बजावलेल्या नोटीसना काही दारूविक्री दुकानांनी, परमिट रूम व बार मालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी शंतनू केमकर व एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात असलेली सर्व दारूविक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश डिसेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिला. या आदेशाचे पालन करत राज्य सरकारने काही बार, परमिट रूम व दारूविक्री करणाऱ्या दुकानांना नोटीस बजावली.याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची दुकाने राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात नाहीत. मात्र ‘दुकान राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात येत आहे की नाही, हे न पाहताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित दुकानांना सरसकट नोटीस बजावली आहे, असे आम्हाला वाटते. प्रत्येक केसचा (दारूविक्री करणारी दुकाने) विचार करूनच योग्य आदेश द्यावा,’ असे म्हणत न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) सचिवांसह उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना सर्वांच्या तक्रारी ५ जुलैपर्यंत ऐकून योग्य आदेश देण्याचे निर्देश दिले.राज्य सरकारने बजावलेल्या नोटीसना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. दुकान मालकांची बाजू न ऐकताच नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तर महामार्गांसंबंधी कोणतीही अधिसूचना सरकारी दफ्तरी नसल्याने सरकारवर ओढावलेल्या लाजिरवाण्या स्थितीवर सारवासारव करताना महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारला अशा प्रकारची अधिसूचना सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘शहरातील जे रस्ते महामार्गाला जोडले जातात, त्याही रस्त्यांवरील दुकानांवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे,’ असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला.स्थगिती देण्यास नकारदुकान राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात येत आहे की नाही, हे न पाहताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित दुकानांना सरसकट नोटीस बजावली आहे, असे आम्हाला वाटते. दुकान मालकांची बाजू न ऐकताच नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे निरीक्षण नोंदवत राज्य सरकारने बजावलेल्या नोटीसना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.