शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

न्यायालये खरेच न्याय देतात का ?- अॅड. उज्ज्वल निकम

By admin | Updated: June 12, 2016 22:00 IST

डान्स बारमुळे पुन्हा अनेकांचे संसार देशोधडीला लागणार आहेत. अशा परिस्थितीत न्यायालये खरेच समाजाला न्याय देतात का?

मिलिंदकुमार साळवे

अहमदनगर, दि. 12 - डान्स बारमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागतात म्हणूनच महाराष्ट्र सरकारने समाजाच्या हितासाठी डान्स बारबंदीचा कायदा केला. पण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवून तरुणांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या डान्स बारला परवानगी देण्याचा आदेश दिला. डान्स बारमुळे पुन्हा अनेकांचे संसार देशोधडीला लागणार आहेत. अशा परिस्थितीत न्यायालये खरेच समाजाला न्याय देतात का? असा खडा सवाल यावर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीच विचारला आहे.

नगरमधल्या टाकळीभान येथे श्रीरामपूर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती दीपक पटारे आणि माऊली प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११७ विधवांना मोफत शिलाई मशिनचे वाटप निकम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अध्यक्षस्थानी होते.

(डान्स बारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं)

"आज राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत. वैफल्यातून कुविचार येतो. डान्स बारमध्ये पैसे उधळून सांगली, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त झाले. इतरांच्याही संसाराची राखरांगोळी झाली. त्यातूनच राज्य सरकारने डान्स बार बंदीचा कायदा केला. पण तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. प्रत्येकाला धंदा करायचा अधिकार आहे, असे म्हणत न्यायालयाने पुन्हा डान्स बारला परवानगी दिली. समाजहितासाठी केलेला कायदा रद्द करणारी न्यायालये खरेच न्याय देतात का?," असं वक्तव्य सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलं आहे.

 

"कायदा हा समाजहितासाठी असतो. सरकारने यासाठी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नव्याने हा कायदा करायची भूमिका घेतली. विजय मल्ल्यासारखे लोक अब्जावधींचे कर्ज घेऊन देशाबाहेर पळून जातात. पण सरकार त्यांचे काही करू शकत नाही. तर हजार रुपयांच्या कर्जासाठी बँकांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याच्या गळ्याला फास बसतो. या परिस्थितीत सरकारने कर्जांबाबत सर्वांगीण विचार करण्याची गरज आहे, "  असे मत मांडत निकम यांनी या कार्यक्रमातून सरकार व न्यायालयाचे कान टोचत शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे.