शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालये खरेच न्याय देतात का ?- अॅड. उज्ज्वल निकम

By admin | Updated: June 12, 2016 22:00 IST

डान्स बारमुळे पुन्हा अनेकांचे संसार देशोधडीला लागणार आहेत. अशा परिस्थितीत न्यायालये खरेच समाजाला न्याय देतात का?

मिलिंदकुमार साळवे

अहमदनगर, दि. 12 - डान्स बारमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागतात म्हणूनच महाराष्ट्र सरकारने समाजाच्या हितासाठी डान्स बारबंदीचा कायदा केला. पण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवून तरुणांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या डान्स बारला परवानगी देण्याचा आदेश दिला. डान्स बारमुळे पुन्हा अनेकांचे संसार देशोधडीला लागणार आहेत. अशा परिस्थितीत न्यायालये खरेच समाजाला न्याय देतात का? असा खडा सवाल यावर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीच विचारला आहे.

नगरमधल्या टाकळीभान येथे श्रीरामपूर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती दीपक पटारे आणि माऊली प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११७ विधवांना मोफत शिलाई मशिनचे वाटप निकम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अध्यक्षस्थानी होते.

(डान्स बारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं)

"आज राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत. वैफल्यातून कुविचार येतो. डान्स बारमध्ये पैसे उधळून सांगली, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त झाले. इतरांच्याही संसाराची राखरांगोळी झाली. त्यातूनच राज्य सरकारने डान्स बार बंदीचा कायदा केला. पण तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. प्रत्येकाला धंदा करायचा अधिकार आहे, असे म्हणत न्यायालयाने पुन्हा डान्स बारला परवानगी दिली. समाजहितासाठी केलेला कायदा रद्द करणारी न्यायालये खरेच न्याय देतात का?," असं वक्तव्य सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलं आहे.

 

"कायदा हा समाजहितासाठी असतो. सरकारने यासाठी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नव्याने हा कायदा करायची भूमिका घेतली. विजय मल्ल्यासारखे लोक अब्जावधींचे कर्ज घेऊन देशाबाहेर पळून जातात. पण सरकार त्यांचे काही करू शकत नाही. तर हजार रुपयांच्या कर्जासाठी बँकांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याच्या गळ्याला फास बसतो. या परिस्थितीत सरकारने कर्जांबाबत सर्वांगीण विचार करण्याची गरज आहे, "  असे मत मांडत निकम यांनी या कार्यक्रमातून सरकार व न्यायालयाचे कान टोचत शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे.