शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

काहीही करा; पण आम्हाला धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढा

By admin | Updated: August 22, 2016 00:59 IST

काहीही करा; पण आम्हाला या धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढा

डिंभे : काहीही करा; पण आम्हाला या धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढा, अशी कळकळीची मागणी बेंढारवाडी ग्रामस्थांनी रविवारी आंबेगावचे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडून भूस्खलन झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आज तहसीलदार रवींद्र सबनीस, तसेच व गटविकास अधिकारी डॉ. अतुल चिखले यांनी बेंढारवाडीची संयुक्त पाहणी केली. या वेळी ग्रमस्थांनी वरील मागणी केली. झालेली घटना अतिशय गंभीर असून बेंढारवाडीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी या वेळी दिली असून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूस्खलन व दरडींमुळे अतिसंवेदनशील झालेल्या बेंढारवाडी (ता. आंबेगाव) येथे भूस्खलनाचे प्रकार वारंवार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात अनेक दरडी कोसळल्या असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेली पक्की सडक वाहून गेली होती. दांगटवाडी या आदिवासी वस्तीच्या वरील बाजूस एक मोठी भेग पडली असून दरवर्षी या भेगेची रुंदी व खोली दोन-दोन फुटांनी वाढत आहे. तळपेवस्ती या सुमारे दहा ते बारा घरे असणाऱ्या लोकवस्तीच्या वरील बाजूला डोंगरावर असणाऱ्या सागाच्या झाडांची दिशा बदलून ही झाडे खालील बाजूस झुकू लागली आहेत. कोटमवडी येथील मारुती गोविंद भवारी या शेतकऱ्याच्या घराजवळ दोनशे फुटांपर्यंत भूस्खलन होऊन मोठमोठ्या दरडी खाली आल्या आहेत. या शेतकऱ्याचे शेततळे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जर ही दरड ५० फूट अलीकडे कोसळली असती तर ही दरड थेट त्यांच्या घरावर कोसळली असती. अजूनही येथे लहान-मोठ्या दरडी सुटत असून घराच्या वरील बाजूस कोसळलेले मोठे झाड धोकादायक स्थितीत आहे. कोसळणाऱ्या दरडी व भूस्खलनामुळे, डोंगर दिसला, की येथील रहिवाशांच्या छातीत धडकी भरत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. (वार्ताहर)>‘लोकमत’च्या वृत्तानंतर आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे व गटविकास अधिकारी डॉ. चिखले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आज तहसीलदार व गटविकास अधिकारी रवींद्र सबनीस यांनी बेंढारवाडीसह मेघोली व जांभोरीची काळवाडी या गावचीही पाहणी केली.