शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची दिवाळी काळी दिवाळी साजरी होणार! - अजित पवार

By admin | Updated: October 20, 2016 18:29 IST

घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय

आप्पासाहेब पाटीलसोलापूर, दि. २० - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, सत्तेतील मंत्र्यांची शिवराळ भाषा़, वादग्रस्त विधाने, सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला लगाम नाही, घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय अशी भिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली़

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर आ़ दिलीप सोपल, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील, जि़प़च्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ़ महादेव पाटील, सोमपाचे उपमहहापौर प्रविण डोंगरे, ठाण्याचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, फारूख शाब्दी, मल्लिकार्जुन पाटील, दिलीप कोल्हे, प्रदीप गारटकर, दिलीप सिध्दे, नगराध्यक्ष रमेश बारसकर, अभिजित ढोबळे, मकरंद निंबाळकर, राजीव क्षीरसागर, महानंदा स्वामी, अजिंक्यराणा पाटील, शिवाजी राजेगांवकर, प्रदीप जगताप, युवती जिल्हाध्यक्ष यशोदा ढवळे, आप्पाराव कोरे, खाजा पठाण, किरण केसूर आदी उपस्थित होते़

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या बळीराजा देशात असमाधानी आहे़ शासनाचा कारभार उदासीन आहे़ आघाडीच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ग्रामस्वच्छताबरोबर अनेक कामे लोकसहभागातून मार्गी लावले़ गुंड प्रवृत्तीच्या माणसांना मुख्यमंत्री फडणवीस भाजपात प्रवेश देतात ही खेदाची बाब आहे़ यामुळे पुरोगामी विचाराला तडा जात आहे़ अच्छे दिनाच्या नावाखाली देशात व राज्यात सत्तेवर आलेले सरकार फसवे निघाले आहे़ अत्याचार, बलात्कार, पोलीसांवरील हल्ले वाढलेले आहेत़ यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कोपर्डी सारखे घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या यास राष्ट्रवादीचे सर्वच खासदार पाठींबा देतील अशीही ग्वाही पवार यांनी यावेळी दिली़.

धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाचे मोर्चे निघत आहेत़ याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे़ ५१ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे़ देशाच्या इतिहासात मराठा समाजाचा सर्वात मोठा मोर्चा औरंगाबादपासून निघाला़ शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून समाजामध्ये अस्वसस्था आहे़ विजय मल्लयांनी ९ हजार कोटी कर्ज बुडविला़ आगामी जि़प़ व पं़स़निवडणुकीत विविध जाती धर्मांना सामावून घेऊन क्षमता पाहावून उमेदवारी द्या, गटातटाला मुठमाती देऊन राष्ट्रवादी पक्षावर निवडणुक लढा, मतभेद ठेवू नका, गटातटाला संपविण्यासाठी मी सक्षम आहे़ अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी ऩप निवडणुकीसाठी स्वबळावर उमेदवार उभा करा, राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय देशात पर्याय नाही पण त्यात मोठा बदल झाला़ मी एकदा बोलून चुकलो त्याचा पश्चाताप केला आहे़ काम करणारा चुकतो असेही पवार यांनी सांगितले़