शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची दिवाळी काळी दिवाळी साजरी होणार! - अजित पवार

By admin | Updated: October 20, 2016 18:29 IST

घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय

आप्पासाहेब पाटीलसोलापूर, दि. २० - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, सत्तेतील मंत्र्यांची शिवराळ भाषा़, वादग्रस्त विधाने, सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला लगाम नाही, घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय अशी भिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली़

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर आ़ दिलीप सोपल, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील, जि़प़च्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ़ महादेव पाटील, सोमपाचे उपमहहापौर प्रविण डोंगरे, ठाण्याचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, फारूख शाब्दी, मल्लिकार्जुन पाटील, दिलीप कोल्हे, प्रदीप गारटकर, दिलीप सिध्दे, नगराध्यक्ष रमेश बारसकर, अभिजित ढोबळे, मकरंद निंबाळकर, राजीव क्षीरसागर, महानंदा स्वामी, अजिंक्यराणा पाटील, शिवाजी राजेगांवकर, प्रदीप जगताप, युवती जिल्हाध्यक्ष यशोदा ढवळे, आप्पाराव कोरे, खाजा पठाण, किरण केसूर आदी उपस्थित होते़

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या बळीराजा देशात असमाधानी आहे़ शासनाचा कारभार उदासीन आहे़ आघाडीच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ग्रामस्वच्छताबरोबर अनेक कामे लोकसहभागातून मार्गी लावले़ गुंड प्रवृत्तीच्या माणसांना मुख्यमंत्री फडणवीस भाजपात प्रवेश देतात ही खेदाची बाब आहे़ यामुळे पुरोगामी विचाराला तडा जात आहे़ अच्छे दिनाच्या नावाखाली देशात व राज्यात सत्तेवर आलेले सरकार फसवे निघाले आहे़ अत्याचार, बलात्कार, पोलीसांवरील हल्ले वाढलेले आहेत़ यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कोपर्डी सारखे घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या यास राष्ट्रवादीचे सर्वच खासदार पाठींबा देतील अशीही ग्वाही पवार यांनी यावेळी दिली़.

धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाचे मोर्चे निघत आहेत़ याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे़ ५१ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे़ देशाच्या इतिहासात मराठा समाजाचा सर्वात मोठा मोर्चा औरंगाबादपासून निघाला़ शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून समाजामध्ये अस्वसस्था आहे़ विजय मल्लयांनी ९ हजार कोटी कर्ज बुडविला़ आगामी जि़प़ व पं़स़निवडणुकीत विविध जाती धर्मांना सामावून घेऊन क्षमता पाहावून उमेदवारी द्या, गटातटाला मुठमाती देऊन राष्ट्रवादी पक्षावर निवडणुक लढा, मतभेद ठेवू नका, गटातटाला संपविण्यासाठी मी सक्षम आहे़ अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी ऩप निवडणुकीसाठी स्वबळावर उमेदवार उभा करा, राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय देशात पर्याय नाही पण त्यात मोठा बदल झाला़ मी एकदा बोलून चुकलो त्याचा पश्चाताप केला आहे़ काम करणारा चुकतो असेही पवार यांनी सांगितले़