शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

यंदाची दिवाळी काळी दिवाळी साजरी होणार! - अजित पवार

By admin | Updated: October 20, 2016 18:29 IST

घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय

आप्पासाहेब पाटीलसोलापूर, दि. २० - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, सत्तेतील मंत्र्यांची शिवराळ भाषा़, वादग्रस्त विधाने, सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला लगाम नाही, घोषणाबाज सरकार या सर्वांचा विचार केला असता केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे संवेदनशिल नाही म्हणून यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी साजरी होणार की काय अशी भिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली़

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर आ़ दिलीप सोपल, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील, जि़प़च्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी आ़ महादेव पाटील, सोमपाचे उपमहहापौर प्रविण डोंगरे, ठाण्याचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, फारूख शाब्दी, मल्लिकार्जुन पाटील, दिलीप कोल्हे, प्रदीप गारटकर, दिलीप सिध्दे, नगराध्यक्ष रमेश बारसकर, अभिजित ढोबळे, मकरंद निंबाळकर, राजीव क्षीरसागर, महानंदा स्वामी, अजिंक्यराणा पाटील, शिवाजी राजेगांवकर, प्रदीप जगताप, युवती जिल्हाध्यक्ष यशोदा ढवळे, आप्पाराव कोरे, खाजा पठाण, किरण केसूर आदी उपस्थित होते़

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या बळीराजा देशात असमाधानी आहे़ शासनाचा कारभार उदासीन आहे़ आघाडीच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ग्रामस्वच्छताबरोबर अनेक कामे लोकसहभागातून मार्गी लावले़ गुंड प्रवृत्तीच्या माणसांना मुख्यमंत्री फडणवीस भाजपात प्रवेश देतात ही खेदाची बाब आहे़ यामुळे पुरोगामी विचाराला तडा जात आहे़ अच्छे दिनाच्या नावाखाली देशात व राज्यात सत्तेवर आलेले सरकार फसवे निघाले आहे़ अत्याचार, बलात्कार, पोलीसांवरील हल्ले वाढलेले आहेत़ यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कोपर्डी सारखे घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या यास राष्ट्रवादीचे सर्वच खासदार पाठींबा देतील अशीही ग्वाही पवार यांनी यावेळी दिली़.

धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाचे मोर्चे निघत आहेत़ याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे़ ५१ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे़ देशाच्या इतिहासात मराठा समाजाचा सर्वात मोठा मोर्चा औरंगाबादपासून निघाला़ शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून समाजामध्ये अस्वसस्था आहे़ विजय मल्लयांनी ९ हजार कोटी कर्ज बुडविला़ आगामी जि़प़ व पं़स़निवडणुकीत विविध जाती धर्मांना सामावून घेऊन क्षमता पाहावून उमेदवारी द्या, गटातटाला मुठमाती देऊन राष्ट्रवादी पक्षावर निवडणुक लढा, मतभेद ठेवू नका, गटातटाला संपविण्यासाठी मी सक्षम आहे़ अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी ऩप निवडणुकीसाठी स्वबळावर उमेदवार उभा करा, राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय देशात पर्याय नाही पण त्यात मोठा बदल झाला़ मी एकदा बोलून चुकलो त्याचा पश्चाताप केला आहे़ काम करणारा चुकतो असेही पवार यांनी सांगितले़