शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोंडीतच दिवाळी

By admin | Updated: November 2, 2016 03:04 IST

भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती

कल्याण : रस्त्याची कोणतीही कामे नसूनही आणि सुटीचा माहोल असूनही भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती. वाहतुक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव, वाहनचालकांतील बेशिस्त, दुकानांचे अतिक्रमण आणि फेरीवाल्यांमुळे पाऊण ते एक तास वाहने एकाच ठिकाणी खोळंबल्याने वाहनचालकांसह प्रवासीही पुरते बेजार झाले. कोडींचा हा सिलसिला सायंकाळपर्यंत सुरूच होता. या कोंडीमुळे ठाकुर्ली-दिवा येथील रेल्वे फाटके दीर्घकाल खुली राहिल्याने लोकल वाहतूकही खोळंबली.कल्याणमधील वालधुनी उड्डाणपूल, सुभाष चौक, मुरबाड रोड, रेल्वे स्थानक परिसर, पत्रीपुल, शीळ मार्ग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लालचौकी, दुर्गाडी चौक, दुर्गाडी उड्डाणपुल आदी ठिकाणी वाहतुक कोंडी होती. वालधुनी पूल ते रेल्वे स्थानक या साधारण १० मिनिटांच्या अंतराला कोंडीमुळे पाऊणतासाचा कालावधी लागत होता. कल्याणमधील या जम्बो कोंडीचा फटका पुढे डोंबिवली शहरालाही बसला. यात मानपाडा चाररस्ता, दत्तमंदिर चौक, टंडन रोड, नांदिवली रोड, कोपर उड्डाणपुल, आयरे रोड, शास्त्रीनगर, घरडा सर्कल ते टिळक चौक या मार्गांवरील वाहतुक पुरती खोळंबली होती. त्यावर उपाय म्हणून वाहतुक पोलिसांनी कल्याणला जाणारी वाहतुक समांतर मार्गावरून वळवण्यात आली होती. खरेदीसाठी स्वत:चे वाहन घेऊन बाहेर पडणारे नागरिक आणि शहरातील वाहनांची दिवसागणिक वाढणारी संख्या यामुळे कोंडीत भर पडल्याचे वाहतुक पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>फतवे कागदावरचशहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक शाखेकडून अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी आहे. यासारखे अनेक फतवे यापूर्वीही जारी करण्यात आले आहेत. परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. सिग्नल यंत्रणा तसेच अन्य सुविधांसाठी केडीएमसीकडून सहकार्य मिळत नाही, अशी ओरड वाहतूक शाखेकडून होते.अवजड वाहतुकीच्या निषेधार्थ चार दिवसांपूर्वी कल्याणच्या रिक्षाचालकांनी काही वेळ रिक्षा बंद ठेवल्या होत्या. दुर्गाडी चौक ते पत्रीपूल या महत्वाच्या मार्गावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव केडीएमसीने मंजूर केला आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही.