शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोंडीतच दिवाळी

By admin | Updated: November 2, 2016 03:04 IST

भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती

कल्याण : रस्त्याची कोणतीही कामे नसूनही आणि सुटीचा माहोल असूनही भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती. वाहतुक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव, वाहनचालकांतील बेशिस्त, दुकानांचे अतिक्रमण आणि फेरीवाल्यांमुळे पाऊण ते एक तास वाहने एकाच ठिकाणी खोळंबल्याने वाहनचालकांसह प्रवासीही पुरते बेजार झाले. कोडींचा हा सिलसिला सायंकाळपर्यंत सुरूच होता. या कोंडीमुळे ठाकुर्ली-दिवा येथील रेल्वे फाटके दीर्घकाल खुली राहिल्याने लोकल वाहतूकही खोळंबली.कल्याणमधील वालधुनी उड्डाणपूल, सुभाष चौक, मुरबाड रोड, रेल्वे स्थानक परिसर, पत्रीपुल, शीळ मार्ग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लालचौकी, दुर्गाडी चौक, दुर्गाडी उड्डाणपुल आदी ठिकाणी वाहतुक कोंडी होती. वालधुनी पूल ते रेल्वे स्थानक या साधारण १० मिनिटांच्या अंतराला कोंडीमुळे पाऊणतासाचा कालावधी लागत होता. कल्याणमधील या जम्बो कोंडीचा फटका पुढे डोंबिवली शहरालाही बसला. यात मानपाडा चाररस्ता, दत्तमंदिर चौक, टंडन रोड, नांदिवली रोड, कोपर उड्डाणपुल, आयरे रोड, शास्त्रीनगर, घरडा सर्कल ते टिळक चौक या मार्गांवरील वाहतुक पुरती खोळंबली होती. त्यावर उपाय म्हणून वाहतुक पोलिसांनी कल्याणला जाणारी वाहतुक समांतर मार्गावरून वळवण्यात आली होती. खरेदीसाठी स्वत:चे वाहन घेऊन बाहेर पडणारे नागरिक आणि शहरातील वाहनांची दिवसागणिक वाढणारी संख्या यामुळे कोंडीत भर पडल्याचे वाहतुक पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>फतवे कागदावरचशहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक शाखेकडून अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी आहे. यासारखे अनेक फतवे यापूर्वीही जारी करण्यात आले आहेत. परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. सिग्नल यंत्रणा तसेच अन्य सुविधांसाठी केडीएमसीकडून सहकार्य मिळत नाही, अशी ओरड वाहतूक शाखेकडून होते.अवजड वाहतुकीच्या निषेधार्थ चार दिवसांपूर्वी कल्याणच्या रिक्षाचालकांनी काही वेळ रिक्षा बंद ठेवल्या होत्या. दुर्गाडी चौक ते पत्रीपूल या महत्वाच्या मार्गावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव केडीएमसीने मंजूर केला आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही.