शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोंडीतच दिवाळी

By admin | Updated: November 2, 2016 03:04 IST

भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती

कल्याण : रस्त्याची कोणतीही कामे नसूनही आणि सुटीचा माहोल असूनही भाऊबीजेनिमित्त मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने वाढल्याने कल्याण-डोंबिवलीत सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होती. वाहतुक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव, वाहनचालकांतील बेशिस्त, दुकानांचे अतिक्रमण आणि फेरीवाल्यांमुळे पाऊण ते एक तास वाहने एकाच ठिकाणी खोळंबल्याने वाहनचालकांसह प्रवासीही पुरते बेजार झाले. कोडींचा हा सिलसिला सायंकाळपर्यंत सुरूच होता. या कोंडीमुळे ठाकुर्ली-दिवा येथील रेल्वे फाटके दीर्घकाल खुली राहिल्याने लोकल वाहतूकही खोळंबली.कल्याणमधील वालधुनी उड्डाणपूल, सुभाष चौक, मुरबाड रोड, रेल्वे स्थानक परिसर, पत्रीपुल, शीळ मार्ग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लालचौकी, दुर्गाडी चौक, दुर्गाडी उड्डाणपुल आदी ठिकाणी वाहतुक कोंडी होती. वालधुनी पूल ते रेल्वे स्थानक या साधारण १० मिनिटांच्या अंतराला कोंडीमुळे पाऊणतासाचा कालावधी लागत होता. कल्याणमधील या जम्बो कोंडीचा फटका पुढे डोंबिवली शहरालाही बसला. यात मानपाडा चाररस्ता, दत्तमंदिर चौक, टंडन रोड, नांदिवली रोड, कोपर उड्डाणपुल, आयरे रोड, शास्त्रीनगर, घरडा सर्कल ते टिळक चौक या मार्गांवरील वाहतुक पुरती खोळंबली होती. त्यावर उपाय म्हणून वाहतुक पोलिसांनी कल्याणला जाणारी वाहतुक समांतर मार्गावरून वळवण्यात आली होती. खरेदीसाठी स्वत:चे वाहन घेऊन बाहेर पडणारे नागरिक आणि शहरातील वाहनांची दिवसागणिक वाढणारी संख्या यामुळे कोंडीत भर पडल्याचे वाहतुक पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>फतवे कागदावरचशहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक शाखेकडून अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी आहे. यासारखे अनेक फतवे यापूर्वीही जारी करण्यात आले आहेत. परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. सिग्नल यंत्रणा तसेच अन्य सुविधांसाठी केडीएमसीकडून सहकार्य मिळत नाही, अशी ओरड वाहतूक शाखेकडून होते.अवजड वाहतुकीच्या निषेधार्थ चार दिवसांपूर्वी कल्याणच्या रिक्षाचालकांनी काही वेळ रिक्षा बंद ठेवल्या होत्या. दुर्गाडी चौक ते पत्रीपूल या महत्वाच्या मार्गावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसा ठराव केडीएमसीने मंजूर केला आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही.