शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

औरंगाबाद तालुक्यात पाण्यावरून दंगल

By admin | Updated: January 11, 2016 02:36 IST

गावाला विहिरीचे पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या एकोड-पाचोड (ता. औरंगाबाद) येथील २०० गावकऱ्यांनी रविवारी लाठ्या-काठ्या घेत गावाजवळील ब्रम्हानंद महाराज मठाच्या

औरंगाबाद/कचनेर : गावाला विहिरीचे पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या एकोड-पाचोड (ता. औरंगाबाद) येथील २०० गावकऱ्यांनी रविवारी लाठ्या-काठ्या घेत गावाजवळील ब्रम्हानंद महाराज मठाच्या १५ एकरवरील पिकांची नासधूस केली. शेतातील इंजिन जाळून वाहनांची मोडतोड केली तसेच मजुरांचे संसार उद्ध्वस्त केले.चिकलठाणा पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला असून सहा गावकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ब्रम्हानंद महाराज मठाला मिळालेल्या इनामी जमिनीवर गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. मात्र या विहिरीचे पाणी गावाला देण्यात मठाच्या प्रशासनाकडून अडथळे आणले जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रविवारी जमावाने तब्बल दोन तास धुडगूस घालत पिकांची नासधूस व जाळपोळ केली. शेतीला पाणी पुरवठा करता, मग गावाला का नाही? पाण्यात घाण व कीटकनाशक का टाकले, याचा जाब विचारत लाठ्या-काठ्या व कुऱ्हाडी घेऊन आलेल्या जमावाने मठाच्या ३० एकर इमानी जमिनीमधील ठिबक सिंचन संच जाळून पाईपलाईन फोडली. १५ एकरवरील ११ हजार शेवग्यांची झाडे तोडली. पाच हजार डाळिंबाची छोटी झाडे उपटून टाकली. ट्रॅक्टर, टेम्पोवर मोठे दगड घातले. दुचाकींची मोडतोड केली. इंजिन पेटविले. जमावाच्या हल्ल्यात येथील मजुरांचे संसार उद्ध्वस्त झाले.ब्रम्हानंद महाराज मठाचे मदन विलास पुरी (रा. आपतगाव) यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब घोडके, विजय घोडके, रावसाहेब मदगे, एकनाथ घोडके, मैनाजी पिवळ, रामभाऊ घोडके, राधाकिसन मदगे, निवृत्ती घोडके, लक्ष्मण घोडके, किशोर घोडके, ज्ञानेश्वर मदगे, बाबासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.आपतगावच्या (ता. औरंगाबाद) ब्रम्हानंद महाराज मठाचे महाराज मदन विलास पुरी यांना त्यांच्या आजोबांच्या काळात पाचोड येथील गावकऱ्यांनी काही इनामी जमीन दिली होती. ही ५२ एकर जमीन महाराजांनी विकसित केली आहे. मदन पुरी त्याची व्यवस्था सांभाळतात. येथे दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी शेताला दिले जाते. त्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरीत कीटकनाशक टाकण्यात आले असून पाण्याला घाण वास येतो. गावाला पाणी देण्यास अडचणी निर्माण केल्या जात असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. (प्रतिनिधी)