शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचे ‘ठाणे’

By admin | Updated: July 2, 2016 03:38 IST

जिल्ह्यातील सातही तालुक्यांत मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून जून महिन्यात ४४८.४० मिमी पावसाची नोंद झाली.

ठाणे : जिल्ह्यातील सातही तालुक्यांत मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून जून महिन्यात ४४८.४० मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारपासून संततधार सुरू असून ६४ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९०० मिमी पाऊस झाला आहे. धरण परिसरातही कालपासून पावसाचे प्रमाण चांगले असून शहराना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, बारवी, आंध्रा, तानसा आदी धरणांमध्ये पाऊस पडला आहे. सर्वाधिक २४ मिमी पाऊस भातसा आणि बारवी धरणात झाला आहे. मात्र, धरण क्षेत्राची पातळी सुधारण्याकरिता अजून पावसाची प्रतीक्षा आहे.भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १२० मिमी पाऊस पडला असून याखालोखाल ठाणे येथे १११ मिमी, उल्हासनगरला ५५मिमी, कल्याण ५४ मिमी, अंबरनाथ ४९ मिमी, शहापूर ४२ मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी म्हणजे १७ मिमी पाऊस मुरबाड तालुक्यात झाल्याची नोंद आहे. आज दिवसभरही सुरू असलेली संततधार वनोत्सवानिमित्तच्या वृक्षलागवडीसाठी उपयुक्त ठरली. अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाचे आता शहरी भागात दमदार आगमन झाले आहे. गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने मागील वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. मागील वर्षी ठाणे शहर आणि परिसरात १ जुलैपर्यंत ८६२.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, यंदा शुक्रवार, १ जुलैपर्यंत ९०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ठाणे शहराच्या अनेक भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. वंदना सिनेमा, चंदनवाडी, श्रीरंग आदी पाच ठिकाणी पाणी तुंबले होते, असे नियंत्रण कक्षाने सांगितले. ठामपाच्या आपत्कालीन कक्षाकडे एकूण २०तक्र ारींची नोंद झाली. त्यामध्ये १ आग, ९ झाडे कोसळण्याच्या, एक भिंत कोसळल्याच्या तक्रारींचा समावेश होता. तर, शास्त्रीनगर भागातील कांबळे चाळीजवळ असलेला नारळाचा वृक्ष पडून प्रतीक कांबळे हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. गेली तीन वर्षे पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा अधिक पाऊस पडावा, अशी अपेक्षा सर्वच लोक बाळगून आहेत. पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात पाठ फिरवली. मात्र, त्यानंतर जूनच्या उत्तरार्धातील पंधरवड्यात महिनाभराची पावसाची सरासरी पूर्ण केली. गेल्या २४ तासांत ठाणे शहरात १४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील हा उच्चांक असल्याचे समजते. दरम्यान, ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी त्या तुलनेत धरण क्षेत्रामध्ये अद्यापही पावसाने हवा तसा जोर पकडलेला नाही.