शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

पालघरला बदलीमुळे जि.प. कर्मचारी अस्वस्थ

By admin | Updated: June 11, 2016 03:35 IST

पालघर जिल्ह्यातील रिक्त जागी ठाणे जिल्हा परिषदेच्या ४७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणे जवळजवळ निश्चित झाले

ठाणे : पालघर जिल्ह्यातील रिक्त जागी ठाणे जिल्हा परिषदेच्या ४७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणे जवळजवळ निश्चित झाले आहेत. आदिवासी, दुर्गम भागात होऊ घातलेल्या बदल्यांमुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. आचारसंहिता संपल्यामुळे सोमवारपासून या कर्मचाऱ्यांना बदल्यांचे आदेश देण्यास प्रारंभ होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नोकरभरतीनंतरपालघर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात होणार आहेत. तेथे प्राधान्याने या कर्मचाऱ्यांना संधी मिळणार आहे. तसा अध्यादेशही राज्य शासनाने काढला आहे. पण, बदल्यांमध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे त्या रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटना करीत आहेत. मात्र, या विरोधालाही विलंब झाल्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न संघटना करीत असल्याचे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले.या बदल्यांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांकडून लेखणीबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. पण, बदल्या होणारच आहेत, हे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्यामुळे हे आंदोलन बारगळले आहे. बदल्यांमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मात्र, नव्या पालघर जिल्ह्याच्या रिक्त पदांवर अद्यापही भरती करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये अध्यादेश काढून दोन्ही जिल्ह्यांत समान पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बिंदू नामावलीनुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ कर्मचाऱ्यांच्या पालघरमध्ये बदल्या झाल्या आहेत. त्यातील बहुसंख्य कर्मचारी कल्याण ते बदलापूर पट्ट्यातील रहिवासी आहेत. (प्रतिनिधी)सेवानिवृत्तीचा विचार?या बदल्यांमधून वयस्कर, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, अपंग या मुद्द्यांचा विचार करून काही व्यक्तींना वगळण्यात आले. मात्र परित्यक्ता, विधवा, माजी सैनिकांचाही या बदल्यांमध्ये समावेश असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. दररोजच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासाला कंटाळून अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याच्या प्रयत्नात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, काहींनी तसे प्रस्तावही तयार केले आहेत. मात्र, त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही.