शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

पालघरला बदलीमुळे जि.प. कर्मचारी अस्वस्थ

By admin | Updated: June 11, 2016 03:35 IST

पालघर जिल्ह्यातील रिक्त जागी ठाणे जिल्हा परिषदेच्या ४७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणे जवळजवळ निश्चित झाले

ठाणे : पालघर जिल्ह्यातील रिक्त जागी ठाणे जिल्हा परिषदेच्या ४७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघणे जवळजवळ निश्चित झाले आहेत. आदिवासी, दुर्गम भागात होऊ घातलेल्या बदल्यांमुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. आचारसंहिता संपल्यामुळे सोमवारपासून या कर्मचाऱ्यांना बदल्यांचे आदेश देण्यास प्रारंभ होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नोकरभरतीनंतरपालघर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात होणार आहेत. तेथे प्राधान्याने या कर्मचाऱ्यांना संधी मिळणार आहे. तसा अध्यादेशही राज्य शासनाने काढला आहे. पण, बदल्यांमध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे त्या रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटना करीत आहेत. मात्र, या विरोधालाही विलंब झाल्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न संघटना करीत असल्याचे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले.या बदल्यांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांकडून लेखणीबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. पण, बदल्या होणारच आहेत, हे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडल्यामुळे हे आंदोलन बारगळले आहे. बदल्यांमध्ये सुमारे २०० पेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मात्र, नव्या पालघर जिल्ह्याच्या रिक्त पदांवर अद्यापही भरती करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये अध्यादेश काढून दोन्ही जिल्ह्यांत समान पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील बिंदू नामावलीनुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ कर्मचाऱ्यांच्या पालघरमध्ये बदल्या झाल्या आहेत. त्यातील बहुसंख्य कर्मचारी कल्याण ते बदलापूर पट्ट्यातील रहिवासी आहेत. (प्रतिनिधी)सेवानिवृत्तीचा विचार?या बदल्यांमधून वयस्कर, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, अपंग या मुद्द्यांचा विचार करून काही व्यक्तींना वगळण्यात आले. मात्र परित्यक्ता, विधवा, माजी सैनिकांचाही या बदल्यांमध्ये समावेश असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. दररोजच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासाला कंटाळून अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याच्या प्रयत्नात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, काहींनी तसे प्रस्तावही तयार केले आहेत. मात्र, त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही.