शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी

By admin | Updated: March 11, 2016 04:12 IST

राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे

मुंबई : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे. पुण्यासह त्यांच्याकडे साताऱ्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे, तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग आणि ठाणे हे दोन जिल्हे सोपवून शिवसेनेशी खुले दोन हात करण्यास मोकळे सोडले आहे.त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय गणिते सांभाळून खा.चव्हाण यांनी प्रत्येकाला जबाबदारी तर दिली आहे, शिवाय महत्त्वाचे नेते जिल्ह्यामध्ये कसे मग्न राहतील, याचीही खबरदारी घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. त्या पार्श्वभूमीवर वाद होणार नाहीत, पण पक्षाचे कामही अडणार नाही, याची काळजी घेत विखेंना उत्तर अहमदनगर, नाशिक आणि अमरावती हे तीन जिल्हे देण्यात आले असून, थोरातांना दक्षिण अहमदनगर आणि उस्मानाबादची जबाबदारी दिली गेली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री राहिलेले विखे, थोरात यांना वगळून या जिल्ह्याची धुरा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली आहे. खा. राजीव सातव यांना हिंगोलीची, तर लातूर, बीड या दोन जिल्ह्यांची जबाबदारी आ. अमित देशमुख यांच्याकडे दिली आहे. नेहमी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या पतंगराव कदम यांना सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित केले आहे, तर डी.पी. सावंत यांना नांदेड आणि परभणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पालघर रोहिदास पाटील यांच्याकडे तर गडचिरोली व नागपूरची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. भंडारा, गोंदियाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. काही जिल्ह्यांच्या बाबतीत अद्याप निर्णय व्हायचे आहेत, शिवाय जिल्हाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत तीही संपेल, असे खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्यांंचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला आहे, त्यांना आधी बदलले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)