शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

काँग्रेस नेत्यांवर जिल्ह्यांची जबाबदारी

By admin | Updated: March 11, 2016 04:12 IST

राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे

मुंबई : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीशी थेट पंगा घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, यांनी आपली राजकीय मुत्सदेगिरी दाखवून दिली आहे. पुण्यासह त्यांच्याकडे साताऱ्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे, तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग आणि ठाणे हे दोन जिल्हे सोपवून शिवसेनेशी खुले दोन हात करण्यास मोकळे सोडले आहे.त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय गणिते सांभाळून खा.चव्हाण यांनी प्रत्येकाला जबाबदारी तर दिली आहे, शिवाय महत्त्वाचे नेते जिल्ह्यामध्ये कसे मग्न राहतील, याचीही खबरदारी घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. त्या पार्श्वभूमीवर वाद होणार नाहीत, पण पक्षाचे कामही अडणार नाही, याची काळजी घेत विखेंना उत्तर अहमदनगर, नाशिक आणि अमरावती हे तीन जिल्हे देण्यात आले असून, थोरातांना दक्षिण अहमदनगर आणि उस्मानाबादची जबाबदारी दिली गेली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री राहिलेले विखे, थोरात यांना वगळून या जिल्ह्याची धुरा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली आहे. खा. राजीव सातव यांना हिंगोलीची, तर लातूर, बीड या दोन जिल्ह्यांची जबाबदारी आ. अमित देशमुख यांच्याकडे दिली आहे. नेहमी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या पतंगराव कदम यांना सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित केले आहे, तर डी.पी. सावंत यांना नांदेड आणि परभणीची जबाबदारी देण्यात आली आहे. पालघर रोहिदास पाटील यांच्याकडे तर गडचिरोली व नागपूरची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. भंडारा, गोंदियाचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. काही जिल्ह्यांच्या बाबतीत अद्याप निर्णय व्हायचे आहेत, शिवाय जिल्हाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत तीही संपेल, असे खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्यांंचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला आहे, त्यांना आधी बदलले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)