वसई : गणोशोत्सव काळात ग्रामीण भागातील वीजेचे भारनियमन करण्यात येत नाही. परंतु महावितरणने यंदा त्यास हरताळ फासला आहे. वसई-विरार मध्ये गेल्या तीन दिवसापासुन सतत वीजपुरवठा खंडीत होत आहे. विरार भागामध्ये सतत वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
वसई, नालासोपारा, विरार, नवघर-माणिकपुर व ग्रामीण भागात दररोज 8 ते 1क् वेळा वीजपुरवठा खंडीत होत असतो. विरार भागातही वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या प्रकारामुळे गणोशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हैराण झाले आहेत. अर्नाळा-बोळींज परिसरात वीजपुरवठा सुरळीत होण्याकामी कोणीही कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यास कर्मचारीवर्ग कार्यालयात उपलब्ध नसतात व असले तरी ग्राहकांशी त्यांचे उद्दाम वर्तन होत असते. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे यंदा गणोशोत्सव मंडळांच्या कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार बंद न झाल्यास जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)