शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

लघुवाद न्यायालयातील पाच ‘बेकायदा’ नेमणुका रद्द

By admin | Updated: April 25, 2017 02:33 IST

मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी पाच कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीरपणे केलेल्या आणि गेली २० वर्षे सुरु ठेवलेल्या नोकऱ्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी पाच कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीरपणे केलेल्या आणि गेली २० वर्षे सुरु ठेवलेल्या नोकऱ्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत.उच्च न्यायालय प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या पाच कर्मचाऱ्यांना १६ नोव्हेंबर २०१५ रोजी कामावरून कमी केले गेले होते. याविरुद्ध या कर्मचाऱ्यांनी केलेल्या रिट याचिका न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने सोमवारी फेटाळल्या.संदीप तुळशीराम मोहिते (भोईवाडा), स्मृती संदेश लिंगायत (जोगेश्वरी-पू.) आणि अविनाश बंडू जाधव, उत्तम गंगाराम तांबे व सताश दामोदर साळवी (तिघेही शासकीय वसाहत, वांद्रे) अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांचे वडिल पूर्वी लघुवाद न्यायालयात नोकरीस होते. ते निवृत्त झाल्यावर त्यांच्या मुलांना सन १९९६-९७ मध्ये प्रथम हमाल म्हणून नेमले गेले. कालांतराने यापैकी लिंगायत व साळवी टंकलेखक/ लिपिक झाले तर जाधव बेलिफ झाले होते.लघुवाद न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी सरकारी परिपत्रकांचा चुकीचा अर्थ लावून या नेमणुका केल्या असल्याने त्या मुळातच बेकायदा ठरतात. त्यामुळे आम्ही या नोकरीसाठी पात्र आहोत किंवा आम्ही प्रदीर्घ काळ काम करीत आहोत म्हणून आम्हाला नोकरीत नियमित केले जावे, ही याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.अन्य सरकारी कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या अशा नेमणुकांची प्रकरणे आमच्यापुढे येतात तेव्हा आम्ही कायद्याची कसोटी लावून त्या रद्द करतो. त्यामुळे खुद्द न्यायालयीन प्रशासनात असा बेकायदेशीरपणा अजिबात खपवून घेतला जाऊ शकत नाही, असेही न्यायमूर्तींनी म्हटले.या पाचही जणांच्या वडिलांनी निवृत्त होताना किंवा झाल्यावर यांची नावे नोकरीसाठी सुचविली होती. त्यानुसार नेमणुका करताना ज्या सरकारी परिपत्रकाचा आधार घेतला गेला त्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जागी, काम अडू नये म्हणून, रोजगार विनिमय कार्यालयातून नावे न मागविता, तीन महिन्यांसाठी हंगामी नेमणुक करण्याची अनुमती दिली होती. त्यानुसार या पाचही जणांना ‘हंगामी’ अशीच नियुक्तीपत्रे देऊन नेमले गेले. उच्च न्यायालय प्रशासनाने सन २००१ मध्ये इन्स्पेक्शन करताना ही बाब लक्षात आणून दिली होती. तरीही तेथील प्रधान न्याायधीशांनी सरकारी परिपत्रकांचा चुकीचा अर्थ लावून त्यांच्या नोकऱ्या सुरु ठेवल्या होत्या. खंडपीठ म्हणते की, मुळात निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यास आपल्या मुलांचे नाव नोकरीसाठी सुचविण्याचा अधिकार नसताना प्रधान न्याायधीश अशा प्रकारच्या नेणुका करूच शकत नाहीत.या सुनावणीत याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांसाठी अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी, लघुवाद न्यायालय व उच्च न्यायालय प्रशासनातर्फे अ‍ॅड. सदीप नारगोळकर यांनी तर राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील सुषमा भेंडे यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)