शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

कोर्टात पान खाल्ल्याने झालेली बडतर्फी अखेर २४ वर्षांनी रद्द!

By admin | Updated: October 13, 2014 05:26 IST

पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिका-यांनी शिक्षा केली व त्याची माहिती स्वत:हून कळविली नाही

मुंबई : पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिका-यांनी शिक्षा केली व त्याची माहिती स्वत:हून कळविली नाही या कारणावरून सेवेतून बडतर्फ केलेल्या अमरावती मध्यवर्ती कारागृहातील एका कारागृह रक्षकास अखेर २४ वर्षांनी न्याय मिळाला आहे. हा कारागृह रक्षक पूर्ण सेवा करून निवृत्त झाला असे मानून त्यास पेन्शनसह सर्व निवृत्तीलाभ द्यावेत,असा आदेश न्यायालयाने दिला आहे.आज वयाच्या सत्तरीला आलेल्या ज्ञानेश्वर विठुजी घुडे यांना कारागृह प्रशासनाने, २६ वर्षांच्या सेवेनंतर ८ सप्टेंबर १९९० रोजी बडतर्फ केले होते. त्याविरुद्ध न्यायालयीन लढा देता देता सप्टेंबर २००३ मध्ये त्यांचे निवृत्तीचे वयही उलटून गेले. त्यामुळे न्या. अशोक भंगाळे व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या नागपूर येथील खंडपीठाने त्यांची बडतर्फी बेकायदा ठरविली तरी त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश दिला नाही. त्याऐवजी घुडे पूर्ण सेवा बजावून नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत, असे मानून त्यांना निवृत्तीच्या तारखेपासून पेन्शनसह सर्व निवृत्तीलाभ द्यावेत, असा आदेश दिला गेला.२६ वर्षांच्या सेवाकाळात घुडे यांच्यावर एकूण सात वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली होती. त्यापैकी तीन वेळा त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखली गेली होती व एकदा तर त्यांच्यावर ड्युटीवर असताना दारुच्या नशेत असभ्य वर्तन केल्याबद्दल कारवाई केली गेली होती. हे लक्षात घेऊन न्यायालयाने मागचा पगार देण्याचा आदेशही दिला नाही.घुडे २९ एप्रिल १९८८ रोजी रजेवर होते व खासगी कामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात गेले होते. तेथे पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिकाऱ्यांनी त्यांना ५० रुपये दंड ठोठावला. घुडे यांचे हे वर्तन गणवेशधारी दलातील शिस्तबद्ध कर्मचाऱ्यास शोभनीय नाही. शिवाय न्यायालयाने केलेल्या या शिक्षेची माहिती घुगे यांनी स्वत:हून कळविलीही नाही, असे कारण देत त्यांना बडतर्फ केले गेले होते. मात्र त्यांचे हे वर्तन योग्य नव्हते हे मान्य केले तरी त्यासाठी दिलेली बडतर्फीची शिक्षा खूपच कठोर आहे, असे म्हणत न्यायालयाने ती रद्द केली. (विशेष प्रतिनिधी)