शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार बरखास्त करा

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. पुन्हा बहुमत सिद्ध करीत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करण्यात यावे,

काँग्रेसची विदर्भ विभागीय बैठक : माणिकराव ठाकरे यांची मागणीनागपूर : भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. पुन्हा बहुमत सिद्ध करीत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी केली. काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे माहेश्वरी भवन येथे आयोजित विदर्भ विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. मोर्चाचे संयोजक व माजी मंत्री नितीन राऊ त, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाक रे, माजी खासदार गेव्ह आवारी, अझहर हुसैन, आमदार अमर काळे, अनिस अहमद, लक्ष्मणराव तायडे, मारोतराव कुंभलकर, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष सुनीता गावंडे, नामदेव उसेंडी, संजय खोडके, प्रफुल्ल गुडधे, प्रदेश सचिव मुन्ना ओझा, हुकुमचंद आमधरे, अभिजित वंजारी आदीसह विदर्भातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, राज्यात यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही गंभीर आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने सरकारने त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे. पीक बुडाल्याने सोयाबीन व धान उत्पादक शेतकाऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर कापसाला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव ठरवून द्यावा. बाजारभावातील रक्कम सरकारने बोनस म्हणून जाहीर करावी. ऊ स उत्पादकांना भाव जाहीर करावा, फळबागांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी केली. मागील तीन वर्षात राज्य सरकारने शेतकऱ्यांना चार हजार कोटींची आर्थिक मदत दिली. परंतु भाजप नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे ८ डिसेंबरला विधानभवनावर हल्लाबोल करणार आहोत. या मोर्चात विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, माजी कें द्रीय मंत्री मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार आदी करणार आहेत. तत्पूर्वी १ व २ डिसेंंबरला राज्यभरात तहसील व जिल्हा कार्यालयावर मोर्चे, ४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. मतदारांनी काँग्रेसला विरोधी पक्षाची जबाबदारी दिली असल्याने काँग्रेस सशक्त विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार आहे. आंदोलनासोबतच अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधान परिषदेत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारणार असल्याचे राजेंद्र मुळक म्हणाले. यावेळी शेखर शेंडे, बबनराव चौधरी, अतुुल कोटेचा, कृष्णकुमार पांडे, झिया पटेल, कुणाल राऊ त यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव मांडावाआजवर विदर्भावर अन्यायच झाला. निवडणुकीत याचा काँग्रेसला फटका बसला. काँग्रेसने अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आणावा, असे मत नितीन राऊ त यांनी मांडले. केंद्र व राज्यातील सरकारचा कारभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यानुसार चालत असल्याची टीका त्यांनी केली.आमदारांचे निलंबन घटनाबाह्यविधानसभेत भाजपचे बहुमत नाही. त्यांची बहुमत सिद्ध करण्याची पद्धती नियमबाह्य आहे. कोणतेही गैरकृ त्य केले नसताना करण्यात आलेले काँगे्रस आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.