शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आयोगातील विसंवाद चव्हाट्यावर !

By admin | Updated: May 11, 2014 00:43 IST

निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच निवडणूक आयोगातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. नियमांवर बोट ठेवून राजकीय पक्षांना वाकवू पाहणार्‍या या संस्थेतील मतभेद जाहीरपणे उघड झाले आहेत

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच निवडणूक आयोगातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. नियमांवर बोट ठेवून राजकीय पक्षांना वाकवू पाहणार्‍या या संस्थेतील मतभेद जाहीरपणे उघड झाले आहेत. महत्त्वाच्या मुद्यांवर संथ प्रतिसाद दिला जात असल्याबद्दल निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्म यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी ब्रह्म हे सर्व निर्णयांमध्ये सहभागी असल्याचे सांगत सारवासरव करण्याचा प्रयत्न केला आहे. 
त्रिसदस्यीय आयोगामध्ये विसंवाद असल्याचा आणि काही निर्णय संथपणे घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. प्रचाराच्या वेळी तसेच मतदान होत असतानाच्या काळात विश्‍वसनीय माहिती मिळविण्यात विलंब लागला त्यामुळेच नरेंद्र मोदींना वाराणशीतील बेनियाबाग येथे रॅलीला परवानगी नाकारणे असो की राहुल गांधी यांना हिमाचल प्रदेशातील विधानाबद्दल नोटीस बजावणे असो वेळ लागणे स्वाभाविक होते, असे सांगत संपत यांनी ब्रह्म यांचे सर्व मुद्दे खोडून काढले. प्रत्येक निर्णयात आयोगातील सहकारी सहभागी असताना ब्रह्म यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्यही व्यक्त केले. 
 
राष्ट्रपतींकडे तक्रार करणार ?
ब्रह्म यांच्या कार्यपद्धतीची माहिती थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कानावर घालण्याचे पाऊल संपत उचलू शकतात. ब्रह्म यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयोगातील माहिती थेट पत्रकारांना देण्याचा प्रकार त्यांनी कारकीर्दीच्या प्रारंभी केला होता, मात्र त्यात वादग्रस्त असे काही नव्हते. प्रसिद्धी माध्यमांना माहिती देणे हे आयोगाचे काम आहे. कोणतेही आयुक्त वैयक्तिक पातळीवर माहिती देत नसतात. ब्रह्म हे दुसरे वरिष्ठ आयुक्त असून, संपत वर्षाअखेर नवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडेच मुख्य निवडणूक आयुक्तपद चालून येईल.
 
मोदी, राहुल गांधी केंद्रस्थानी
निवडणूक आयोगातील वादात मोदींची रॅली आणि राहुल गांधी यांचे ईव्हीएम प्रकरण केंद्रस्थानी आले. मतदान सुरू असताना राहुल गांधी ईव्हीएम जवळ गेल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. ईव्हीएमचा वाद उफाळला असतानाच मोदींना वाराणशीत रॅलीला परवानगी नाकारल्याच्या मुद्यावरून भाजपाने आयोगाला धारेवर धरले. संपत यांनी ईव्हीएम प्रकरणाचाही विस्तृत खुलासा केला आहे.
 
संपत यांचा खुलासा 
च्आयोगात तीन आयुक्त कामकाज पाहत असून, ते एकत्रितपणे निर्णय घेतात. 
च्मोदींच्या सभास्थानाविषयीचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला.
च्आयोगाने पूर्ण क्षमतेनिशी व जिल्हा प्रशासनाने वस्तुस्थिती समजावून घेतली.
च्ही सर्व प्रक्रिया ७ मे रोजी दुपारपासून सुरू झाली. त्यामुळे निर्णय घेण्यात किंवा त्याची माहिती देण्यात विलंब झाला, असे म्हणता येणार नाही. 
च्मोदींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा निर्णय योग्यच होता. मोदींनी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे उल्लंघन केल्याचे आयोगाचे एकमत होते. त्यांनी मतदान केंद्राबाहेर १00 मीटरच्या परिसरात पत्रपरिषद घेतली. हा प्रचाराचाच भाग मानला जातो.