शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

फोनवरून अपहरणाचा उलगडा

By admin | Updated: April 3, 2017 03:23 IST

परराज्यातून कंट्रोलरूमवर आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी पुण्यातील पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा तिढा सोडवला आहे.

नवी मुंबई : परराज्यातून कंट्रोलरूमवर आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी पुण्यातील पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा तिढा सोडवला आहे. आईवडिलांच्या निधनानंतर हा मुलगा संगोपनासाठी चुलत्यांकडे असताना तो बेपत्ता झाला होता. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे या मुलाचा शोध लागला आहे. २७ मार्च रोजी उत्तरप्रदेशमधील एका व्यक्तीने नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये फोन केला होता. त्याने वाराणसीमध्ये पाच वर्षांचा मुलगा आढळला असून तो महाराष्ट्रातला असल्याची शक्यता वर्तवली होती. नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा होडगे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली चौधरी, हवालदार सुदाम पाटील, हिराजी राऊत यांनी त्या मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. याकरिता त्यांनी मुलासोबत फोनवरून संभाषण केले; परंतु मराठी व हिंदीमध्ये बोलूनही त्याला काहीच स्पष्ट बोलता येत नसतानाही, पोलिसांनी सुमारे दीड ते दोन तास त्याच्यासोबत संभाषण केले. अखेर रूपाली चौधरी यांनी त्या मुलाची हिंदीत चौकशी करून गावाचे नाव विचारले. या वेळी त्या पाच वर्षीय मुलाने गॅसपेटा असे गावाचे नाव सांगितले. यावरून पोलिसांनी तपासाला पुण्याची थोडीफार माहिती असल्यामुळे गंजपेठ नावाचा भाग असल्याचे चौधरी यांना माहीत होते. यामुळे मुलाचा फोटो मागवून तो खडक पोलिसांपर्यंत पोहोचवून चौकशी केली. या वेळी काही सदर मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे उघड होऊन प्रेम तिवारी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. या कामगिरीचे कौतुक पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त सुधाकर पठारे, सहायक आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. तसेच या कामगिरीबाबत उपनिरीक्षक रूपाली चौधरी यांना चार हजार रुपये, तर हवालदार सुदाम पाटील व हिराजी राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. (प्रतिनिधी)>...अन् प्रेमचे कुटुंब गहिवरलेप्रेम मिळाल्याचे ऐकून त्याच्या कुटुंबालाही अत्यंत आनंद झाला. प्रेमच्या आईवडिलांचे निधन झाले असल्याने संगोपनासाठी तो चुलत्यांकडे होता. काही दिवसांपूर्वी राहत्या परिसरातून तो संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. मात्र, केवळ चौकशीसाठी आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करून त्याचा कुटुंबीयांशी संपर्क करून दिला आहे.