शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

फोनवरून अपहरणाचा उलगडा

By admin | Updated: April 3, 2017 03:23 IST

परराज्यातून कंट्रोलरूमवर आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी पुण्यातील पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा तिढा सोडवला आहे.

नवी मुंबई : परराज्यातून कंट्रोलरूमवर आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी पुण्यातील पाच वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा तिढा सोडवला आहे. आईवडिलांच्या निधनानंतर हा मुलगा संगोपनासाठी चुलत्यांकडे असताना तो बेपत्ता झाला होता. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे या मुलाचा शोध लागला आहे. २७ मार्च रोजी उत्तरप्रदेशमधील एका व्यक्तीने नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये फोन केला होता. त्याने वाराणसीमध्ये पाच वर्षांचा मुलगा आढळला असून तो महाराष्ट्रातला असल्याची शक्यता वर्तवली होती. नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा होडगे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली चौधरी, हवालदार सुदाम पाटील, हिराजी राऊत यांनी त्या मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. याकरिता त्यांनी मुलासोबत फोनवरून संभाषण केले; परंतु मराठी व हिंदीमध्ये बोलूनही त्याला काहीच स्पष्ट बोलता येत नसतानाही, पोलिसांनी सुमारे दीड ते दोन तास त्याच्यासोबत संभाषण केले. अखेर रूपाली चौधरी यांनी त्या मुलाची हिंदीत चौकशी करून गावाचे नाव विचारले. या वेळी त्या पाच वर्षीय मुलाने गॅसपेटा असे गावाचे नाव सांगितले. यावरून पोलिसांनी तपासाला पुण्याची थोडीफार माहिती असल्यामुळे गंजपेठ नावाचा भाग असल्याचे चौधरी यांना माहीत होते. यामुळे मुलाचा फोटो मागवून तो खडक पोलिसांपर्यंत पोहोचवून चौकशी केली. या वेळी काही सदर मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे उघड होऊन प्रेम तिवारी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. या कामगिरीचे कौतुक पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त सुधाकर पठारे, सहायक आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. तसेच या कामगिरीबाबत उपनिरीक्षक रूपाली चौधरी यांना चार हजार रुपये, तर हवालदार सुदाम पाटील व हिराजी राऊत यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. (प्रतिनिधी)>...अन् प्रेमचे कुटुंब गहिवरलेप्रेम मिळाल्याचे ऐकून त्याच्या कुटुंबालाही अत्यंत आनंद झाला. प्रेमच्या आईवडिलांचे निधन झाले असल्याने संगोपनासाठी तो चुलत्यांकडे होता. काही दिवसांपूर्वी राहत्या परिसरातून तो संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. मात्र, केवळ चौकशीसाठी आलेल्या फोनवरून नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करून त्याचा कुटुंबीयांशी संपर्क करून दिला आहे.