शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

घातपात झाला यशस्वी पण लक्ष्य चुकले

By admin | Updated: June 13, 2016 03:33 IST

कटामध्ये अग्रभागी राहिलेल्या सातपाटी येथील ९० वर्षीय स्वातंत्र्य सैनिक विनायक म्हात्रे यांचे शनिवारी निधन झाले.

पालघर : १९४२ च्या चलेजाव आंदोलनात इंग्रजाच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्कराची दारूगोळ्याने भरलेली रेल्वे पाडण्याच्या कटामध्ये अग्रभागी राहिलेल्या सातपाटी येथील ९० वर्षीय स्वातंत्र्य सैनिक विनायक म्हात्रे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.शासनाच्यावतीनेही त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.पालघर तालुक्यातील सातपाटी हे गांव मासेमारीचे बंदर म्हणून परिचित असले तरी पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक (४७) सातपाटी येथे आहेत. स्वातंत्र्य चळवळी चे महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्वातंत्र्य संग्रामातील नेते सातपाटीमध्ये जमत होते.देशभर इंग्रजांविरोधात चलेजावचे आंदोलन सुरु असतांना पालघरमध्ये ही १४ आॅगस्ट १९४२ रोजी कार्यकर्ते इंग्रजांविरोधात घोषणा देत कचेरीच्या दिशेने निघाले असतांना इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात काशीनाथ भाई पागधरे, गोविन्द ठाकुर, रामप्रसाद तिवारी, सुकुर मोरे, रामचंद्र चुरी या पाच स्वातंत्र्यवीराना हौतात्म्य प्राप्त झाले होते.याचा बदला घेण्यासाठी टपलेल्या तरुण स्वातंत्र्य सैनिकांना याच वेळी मुंबईहून दारूगोळा भरलेली रेल्वे पालघर मार्गे जाणार असल्याची माहिती सातपाटीचे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक नारायण दांडेकर यांच्या द्वारे मिळाली. ही गाडी उडवून द्यायची असा कट जमलेल्या सर्वानी रचला. नारायण दांडेकरा च्या नेतृत्वाखाली हे काम करायचे असे ठरवित सर्व कामाला लागले. दांडेकरांनी ही गाडी केव्हा सुटणार याचा तपास करायचा, नांदगांवच्या यादव पाटील यांनी रुळ उखडण्या बाबत माहिती गोळा करायची,नरोत्तम पाटील यांनी पुलाची पाहणी करायची असे सर्वानुमते ठरले.२६ आॅक्टोबरला दारू गोळा भरलेली गाडी मुंबईहून सुटणार असा निरोप नारायण दांडेकर यांनी दिल्या नंतर सर्वं कामाला लागले. विनायक म्हात्रे सह त्यांच्या ८ ते १९ मित्रांनी संध्याकाळी आपल्या मच्छीमारी नौका किनाऱ्या वर मसेमारीला जायचे म्हणून सज्ज ठेवल्या. रात्रीच्या अंधारात सातपाटीमधून सर्व जन खारेकुरणच्या मार्गाने पंचाळीच्या पुलाजवळ जमले. मात्र गाडी येण्याची वेळ झाली असतांना रुळ उखडण्यात बाकबगार असलेले यादव पाटील घटना स्थळी पोहचले नसल्याने सर्व चिंताग्रस्त होते. शेवटी खूप उशीर झाल्याने रात्रो १२ च्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी रुळाचे नटबोल्ट काढायला सुरूवात केली आणि रुळाचा एक मोठा भाग उचकटून फेकून देण्यात ते यशस्वी ठरले. याच वेळी गाडी जवळ येत असल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला आणि गाडी उलटल्या नंतर दारूगोळ्याचा स्फोट होईल हा धोका ओळखून सर्व लांब उभे राहिलो. इंजिन पुढे जाताच २८ ते ३० डबे कोसळले. म्हात्रेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी किनाऱ्यालगत नांगरुन ठेवलेल्या नौकेतून आपपली गावे गाठली होती.मृत्यूच्या दाढेत शिरून आपण किती मोठे साहस केले यांचा जराही थांगपत्ता नातेवाईकांसह गावकऱ्यांना लागू दिला नसल्याचा पराक्र म त्यांनी लोकमतला कथन केला होता. समुद्रातून परत आल्या नंतर आपल्या घातपातामुळे दारूगोळा नेणारी गाडी न पडता सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी पुढे पाठविलेली गाडी पडली हे कळाल्या नंतर आम्ही खूप निराश झालो असे त्यांनी सांगितले होते. त्यांचे शनिवारी 90 व्या वर्षी निधन झाले. उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कनीचे यांनी त्यांचे दर्शन घेऊन शासनाच्यावतीने त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.