शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

घातपात झाला यशस्वी पण लक्ष्य चुकले

By admin | Updated: June 13, 2016 03:33 IST

कटामध्ये अग्रभागी राहिलेल्या सातपाटी येथील ९० वर्षीय स्वातंत्र्य सैनिक विनायक म्हात्रे यांचे शनिवारी निधन झाले.

पालघर : १९४२ च्या चलेजाव आंदोलनात इंग्रजाच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्कराची दारूगोळ्याने भरलेली रेल्वे पाडण्याच्या कटामध्ये अग्रभागी राहिलेल्या सातपाटी येथील ९० वर्षीय स्वातंत्र्य सैनिक विनायक म्हात्रे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.शासनाच्यावतीनेही त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.पालघर तालुक्यातील सातपाटी हे गांव मासेमारीचे बंदर म्हणून परिचित असले तरी पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक (४७) सातपाटी येथे आहेत. स्वातंत्र्य चळवळी चे महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्वातंत्र्य संग्रामातील नेते सातपाटीमध्ये जमत होते.देशभर इंग्रजांविरोधात चलेजावचे आंदोलन सुरु असतांना पालघरमध्ये ही १४ आॅगस्ट १९४२ रोजी कार्यकर्ते इंग्रजांविरोधात घोषणा देत कचेरीच्या दिशेने निघाले असतांना इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात काशीनाथ भाई पागधरे, गोविन्द ठाकुर, रामप्रसाद तिवारी, सुकुर मोरे, रामचंद्र चुरी या पाच स्वातंत्र्यवीराना हौतात्म्य प्राप्त झाले होते.याचा बदला घेण्यासाठी टपलेल्या तरुण स्वातंत्र्य सैनिकांना याच वेळी मुंबईहून दारूगोळा भरलेली रेल्वे पालघर मार्गे जाणार असल्याची माहिती सातपाटीचे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक नारायण दांडेकर यांच्या द्वारे मिळाली. ही गाडी उडवून द्यायची असा कट जमलेल्या सर्वानी रचला. नारायण दांडेकरा च्या नेतृत्वाखाली हे काम करायचे असे ठरवित सर्व कामाला लागले. दांडेकरांनी ही गाडी केव्हा सुटणार याचा तपास करायचा, नांदगांवच्या यादव पाटील यांनी रुळ उखडण्या बाबत माहिती गोळा करायची,नरोत्तम पाटील यांनी पुलाची पाहणी करायची असे सर्वानुमते ठरले.२६ आॅक्टोबरला दारू गोळा भरलेली गाडी मुंबईहून सुटणार असा निरोप नारायण दांडेकर यांनी दिल्या नंतर सर्वं कामाला लागले. विनायक म्हात्रे सह त्यांच्या ८ ते १९ मित्रांनी संध्याकाळी आपल्या मच्छीमारी नौका किनाऱ्या वर मसेमारीला जायचे म्हणून सज्ज ठेवल्या. रात्रीच्या अंधारात सातपाटीमधून सर्व जन खारेकुरणच्या मार्गाने पंचाळीच्या पुलाजवळ जमले. मात्र गाडी येण्याची वेळ झाली असतांना रुळ उखडण्यात बाकबगार असलेले यादव पाटील घटना स्थळी पोहचले नसल्याने सर्व चिंताग्रस्त होते. शेवटी खूप उशीर झाल्याने रात्रो १२ च्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी रुळाचे नटबोल्ट काढायला सुरूवात केली आणि रुळाचा एक मोठा भाग उचकटून फेकून देण्यात ते यशस्वी ठरले. याच वेळी गाडी जवळ येत असल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला आणि गाडी उलटल्या नंतर दारूगोळ्याचा स्फोट होईल हा धोका ओळखून सर्व लांब उभे राहिलो. इंजिन पुढे जाताच २८ ते ३० डबे कोसळले. म्हात्रेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी किनाऱ्यालगत नांगरुन ठेवलेल्या नौकेतून आपपली गावे गाठली होती.मृत्यूच्या दाढेत शिरून आपण किती मोठे साहस केले यांचा जराही थांगपत्ता नातेवाईकांसह गावकऱ्यांना लागू दिला नसल्याचा पराक्र म त्यांनी लोकमतला कथन केला होता. समुद्रातून परत आल्या नंतर आपल्या घातपातामुळे दारूगोळा नेणारी गाडी न पडता सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी पुढे पाठविलेली गाडी पडली हे कळाल्या नंतर आम्ही खूप निराश झालो असे त्यांनी सांगितले होते. त्यांचे शनिवारी 90 व्या वर्षी निधन झाले. उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कनीचे यांनी त्यांचे दर्शन घेऊन शासनाच्यावतीने त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.