शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

राज्यात ३.६० लाखावर स्मृतिभ्रंश रुग्ण

By admin | Updated: December 15, 2015 04:01 IST

अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण

नागपूर : अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण महाराष्ट्रात असतील, असे २०१० च्या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. आमदार सुनील प्रभू, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, नेहमीच्या कामात गोंधळून जाणे, वार, तारीख विसरणे, साधी कामे करताना काही गोष्टी विसरणे ही स्मृतीभ्रंश आजाराची लक्षणे आहेत. अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार दर १५ वर्षांनी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत असल्याचे अहवलात दिसून येते. महाराष्ट्रात ४ प्रादेशिक मनोरुग्णालय, १२ जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र, १४ वैद्यकीय महाविद्यालय तसेच ४ महानगरपालिका रुग्णालयात अल्झायमर (स्मृतिभ्रंश) ग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा दिल्या जातात. प्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना या आजाराची माहिती देण्याकरिता व त्यांचे लवकर निदान होण्याकरिता या आजाराबद्दल माहिती दिली जाते.(प्रतिनिधी)