शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३.६० लाखावर स्मृतिभ्रंश रुग्ण

By admin | Updated: December 15, 2015 04:01 IST

अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण

नागपूर : अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण महाराष्ट्रात असतील, असे २०१० च्या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. आमदार सुनील प्रभू, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, नेहमीच्या कामात गोंधळून जाणे, वार, तारीख विसरणे, साधी कामे करताना काही गोष्टी विसरणे ही स्मृतीभ्रंश आजाराची लक्षणे आहेत. अल्झायमर अ‍ॅण्ड रिलेटेड सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार दर १५ वर्षांनी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत असल्याचे अहवलात दिसून येते. महाराष्ट्रात ४ प्रादेशिक मनोरुग्णालय, १२ जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र, १४ वैद्यकीय महाविद्यालय तसेच ४ महानगरपालिका रुग्णालयात अल्झायमर (स्मृतिभ्रंश) ग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा दिल्या जातात. प्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना या आजाराची माहिती देण्याकरिता व त्यांचे लवकर निदान होण्याकरिता या आजाराबद्दल माहिती दिली जाते.(प्रतिनिधी)