शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

आॅक्टोबर महिन्यातही डासांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 04:25 IST

पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईत डेंग्यू, मलेरिया, ताप, गॅस्ट्रो असे साथीचे आजार डोके वर काढू लागतात.

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर मुंबईत डेंग्यू, मलेरिया, ताप, गॅस्ट्रो असे साथीचे आजार डोके वर काढू लागतात. मान्सून परतला असला तरीही साथीच्या आजारांनी अजूनही मुंबईत काढता पाय घेतलेला नाही. ठिकठिकाणी साचून राहिलेल्या पाण्यामुळे तिथे डासांची पैदास होऊन चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होण्याचा धोका मुंबईकरांना आहे. त्यातच आॅक्टोबर महिन्यात चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच चिकुनगुनियाचे ४ रुग्ण आढळून आले असून, २४ चिकुनगुनियाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पावसाळा संपताना पुन्हा एकदा महापालिकेपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. यंदा पावसाळ्यात पुन्हा एकदा डेंग्यूने मुंबईत डोके वर काढले होते. पण, आॅक्टोबर महिन्यात आता चिकुनगुनियाचे रुग्ण आढळू लागले आहेत. एडिस इजिप्ती डासामुळेच चिकुनगुनियाची लागण होते. ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे ही या तापाची सामान्य लक्षणे आहेत. पावसाळा संपल्यावर अनेकदा छपरावर टाकलेल्या ताडपत्र्या काढल्या जात नाहीत. एसी साफ केले जात नाहीत. अडगळीत टाकलेल्या वस्तू टाकून दिल्या जात नाहीत. या ठिकाणी पाणी तसेच साचून राहते. या साचलेल्या पाण्यात एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पावसाळा संपल्यावर घराची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली पाहिजे. महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. आॅक्टोबरमध्ये १ हजार ९१ घरांची तपासणी करण्यात आली आहे. तर, १ हजार १३० कंटेनरचीदेखील तपासणी करण्यात आली आहे. घरांत, झोपडपट्टी परिसरात आणि अन्य परिसरात धूरफवारणी सुरू आहे. (प्रतिनिधी)>डासांची पैदास रोखण्यासाठी काय करावेघरात डास येऊ नयेत म्हणून दार-खिडक्या बंद ठेवा. घरात डास झाले असल्यास झोपताना जाळीचा वापर करा.डासांची पैदास रोखण्यासाठी स्वच्छता करा, साचलेले पाणी साफ करा.घरातील मनीप्लाण्ट, फेंगशुई प्लाण्टमधले पाणी बदला. संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करा.