शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कुलगुरूंच्या परतण्यावर विद्यापीठात चर्चा सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:17 IST

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले.

मुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. पण तेथून काहीच उत्तर न आल्याने त्यांनी थेट दिल्लीशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे कुलगुरूंच्या वापसीची जोरदार चर्चा सुरू असली तरी राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.एप्रिल महिन्यात कुलगुरू देशमुख यांनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची घोषणा केली. पण त्यातील तांत्रिक अडचणींमुळे सप्टेंबर महिना उजाडूनही हजारो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकालाच्या गोंधळामुळे राज्यपालांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर, ९ आॅगस्टपासून कुलगुरू सुटीवर आहेत. यानंतर निकालांचे काम प्रभारी खांद्यावर सोपवण्यात आले. आता निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या वेळी देशमुख यांनी रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण राजकीय वर्तुळात देशमुखांसाठी पूरक वातावरण नाही. राज्यपालांना पत्र पाठवून बरेच दिवस झाले, पण राजभवनाने सध्या फक्त निकालावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शिक्षणमंत्र्यांनीही या प्रश्नावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ३२ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीचसप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाला तब्बल ३२ हजार ७४५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. रविवारी ४ हजार ३४९ उत्तरपत्रिकांची तपासणी झाली. तर विद्यापीठाच्या ४७७ निकालांपैकी ४६९ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अजून ८ निकाल जाहीर झालेले नाहीत.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ