शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आर्थिक अपयश झाकण्यासाठी देशभक्तीची चर्चा

By admin | Updated: March 7, 2016 03:37 IST

आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली.

मुंबई : आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली. आर्थिक ओझ्याखाली दबलेले सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाच्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात होऊ नये, यासाठीच देशभक्तीचा मुद्दा पुढे करण्यात आल्याचे येचुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुरोगामी संस्था, संघटना आणि डाव्या आघाडीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात येचुरी म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची आक्रमक विचारधारा थोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी देशभक्तीच्या भावनेचा दुरुपयोग केला जात आहे.’ प्रत्यक्ष करात सूट देऊन केंद्र सरकारने धनदांडग्यांची सोय केली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ६ लाख ११ हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचे खुद्द सरकारनेच मान्य केले आहे. धनदांडग्यांना सवलत देणारे सरकार सामान्य जनतेवर मात्र अप्रत्यक्ष कराचा बोजा लादत आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या २६ टक्क्क््यांनी वाढल्याचा आरोप येचुरी यांनी केला. मोदी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे येचुरी या वेळी म्हणाले. मात्र, प. बंगालमधील आगामी निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी अथवा युतीची शक्यता नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी चालविली आहे. मात्र, आसाम वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला स्थान नसल्याचे येचुरी म्हणाले. (प्रतिनिधी)