शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अपयश झाकण्यासाठी देशभक्तीची चर्चा

By admin | Updated: March 7, 2016 03:37 IST

आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली.

मुंबई : आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली. आर्थिक ओझ्याखाली दबलेले सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाच्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात होऊ नये, यासाठीच देशभक्तीचा मुद्दा पुढे करण्यात आल्याचे येचुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुरोगामी संस्था, संघटना आणि डाव्या आघाडीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात येचुरी म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची आक्रमक विचारधारा थोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी देशभक्तीच्या भावनेचा दुरुपयोग केला जात आहे.’ प्रत्यक्ष करात सूट देऊन केंद्र सरकारने धनदांडग्यांची सोय केली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ६ लाख ११ हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचे खुद्द सरकारनेच मान्य केले आहे. धनदांडग्यांना सवलत देणारे सरकार सामान्य जनतेवर मात्र अप्रत्यक्ष कराचा बोजा लादत आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या २६ टक्क्क््यांनी वाढल्याचा आरोप येचुरी यांनी केला. मोदी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे येचुरी या वेळी म्हणाले. मात्र, प. बंगालमधील आगामी निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी अथवा युतीची शक्यता नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी चालविली आहे. मात्र, आसाम वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला स्थान नसल्याचे येचुरी म्हणाले. (प्रतिनिधी)