शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

युतीची चर्चाच थांबली, स्वबळाची शक्यता आणखी वाढली

By admin | Updated: January 21, 2017 06:22 IST

महापालिका निवडणुकीसाठीची भाजपा-शिवसेना या दोन पक्षात सुरू असलेली युतीची बोलणी थांबली

यदु जोशी,

मुंबई- महापालिका निवडणुकीसाठीची भाजपा-शिवसेना या दोन पक्षात सुरू असलेली युतीची बोलणी थांबली असून आता एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यामुळे आता युतीच्या भवितव्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे.युतीसाठी दोन्ही पक्षांकडून नेमण्यात आलेल्या नेत्यांमध्येच रुसवेफुगवे झाले असून बोलणीऐवजी त्यांनी एकमेकांशी कट्टी केल्याचे आजचे चित्र आहे. मुख्यमंत्री देतील तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी लोकमतला सांगितले तर, ‘आम्ही मुख्यमंत्र्यांना भूमिका कळविली आहे. आता त्यांनीच काय तो निर्णय घ्यावा’ असे सांगत शिवसेनेचे नेते आ.अनिल परब यांनी हात वर केले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते युतीबाबत एकमेकांशी चर्चा करतील का, कधी करतील आणि त्यातून काय बाहेर येईल या बाबत उत्सुकता आहे. भाजपाकडून ११४ जागांची यादी शुक्रवारी शिवसेनेला दिली जाणार होती. मुख्यमंत्र्यांनी काल या यादीवर शिक्कामोर्तब केले होते. असे काहीही झाले नाही. ‘आज युतीची चर्चा होणार नाही,’ असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांतून सांगण्याऐवजी थेट कळविले असते तर बरे झाले असते, अशी नाराजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, युतीसाठी चर्चेकरता शिवसेनेकडून ज्युनिअर नेत्यांना पाठवले. किमान भाजपाकडून वरिष्ठ नेते चर्चेला असताना, अशी अपेक्षा नव्हती. युतीच्या चर्चेस भाजपाकडून येत असलेले तावडे, प्रकाश महेता, आशिष शेलार या तिघांवरही आरोप आहेत. त्यामुळे आम्हाला पारदर्शकतेची सुरुवात करायची असती तर तिथून केली असती, असा हल्लाबोल सेनेचे नेते आ. परब यांनी आज केला. त्यावर ‘याआधी युतीसाठी दोन बैठका झाल्या. त्याला आम्ही तिघेही हजर होतो. तेव्हा आमच्यावर आरोप आहेत हे शिवसेनेला सुचले नाही का, तेव्हा आक्षेप नव्हता मग आताच उपरती का झाली,’ असा सवाल तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपाने मागितलेल्या ११४ जागा सेनेने अमान्य केल्या असून तसे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. >युती होणार कशी?भाजपा-सेनेची युती झाली तर शिवसेनेला निवडणूक होईपर्यंत मोदी-अमित शहांवर टीका न करण्याचा तह करावा लागेल.युती झाली तर मुंबई महापालिकेच्या कारभारावरील टीकेसंदर्भात आशिष शेलार यांच्या तोंडाला कुलूप लागेल. युती झाली तर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा जिवंत होईल, असा तर्क दिला जात आहे.>बालेकिल्ल्यात भाजपाला हव्या जागाशिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परळ, वरळी, दादर, माटुंगा, माहीम अशा भागांतही भाजपाने जागा मागितल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. तथापि, आता हे भाग पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांचा तोंडावळा बदलला आहे. टॉवर्स उभे झालेत, मतदारांची मानसिकतादेखील बदलली आहे, हे शिवसेनेने लक्षात घ्यावे, असा टोला भाजपाच्या एका नेत्याने हाणला. 2 वर्षांपूर्वी आम्ही कमळाला मते द्या म्हणून लोकांना आवाहन केले. आता युती केली तर धनुष्याला मते द्या, असे काही ठिकाणी सांगावे लागेल. तीन वर्षांनी पुन्हा कमळाला मते द्या म्हणावे का, असा सवाल भाजपा आमदारांनी केल्याचे समजते.>आरोप जिव्हारीखा. किरीट सोमय्या, आ. आशिष शेलार हे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर करीत असलेले आरोप सेनेच्या जिव्हारी लागले आहेत.>भाजपा अस्वस्थदुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेमुळे भाजपा अस्वस्थ असून युतीतील दुराव्याचे हेही एक कारण आहे. >मुंबईतील आघाडी संपुष्टात - तटकरेमुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होण्याची शक्यता कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच संपुष्टात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे केला. काही जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे.