शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

शासकीय खरेदीत केंद्रीय कंपन्यांना सवलत

By admin | Updated: October 19, 2016 06:15 IST

स्तूंच्या खरेदीसाठीच्या धोरणात २७ प्रकारच्या सुधारणा करून हे धोरण अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.

मुंबई : राज्य शासनाची विविध कार्यालये, शासकीय उपक्रम आणि स्वायत्त संस्थांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठीच्या धोरणात २७ प्रकारच्या सुधारणा करून हे धोरण अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध कंपन्या आतापर्यंत अशा प्रकारच्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास फारशा इच्छुक नसत. कारण, बयाणा रक्कम भरावी लागत असे. ती त्यांना परवडणारी नव्हती. तसेच, खासगी कंपन्यांना या खरेदीपोटी आगाऊ रक्कम दिली जाते पण केंद्र सरकारी कंपन्यांना ती दिली जात नव्हती. या दोन्ही कारणांमुळे दर्जेदार मालाचे उत्पादन करणाऱ्या केंद्र सरकारी कंपन्या राज्यामध्ये निविदाच भरत नसत. आज केलेल्या सुधारणांनुसार केंद्र सरकारी कंपन्यांकडून आता अशी बयाणा रक्कम घेतली जाणार नाही. तसेच त्यांना आगाऊ रक्कमदेखील देण्यात येणार आहे. या शिवाय, राज्य वा केंद्र सरकारच्या विविध कंपन्या वा उपक्रम ज्या वस्तूंचे उत्पादन करतात त्यांच्या खरेदीसाठी स्वतंत्रपणे निविदा काढण्यात येतील. या कंपन्या उत्पादन करीत नसलेल्या वस्तूंच्या सोबत निविदा काढण्यात येणार नाहीत. खरेदीची पद्धत अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. त्यातील मानवी हस्तक्षेप कमीतकमी करून संगणकीय वापरावर भर देण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)>अंबरनाथ रूग्णालय शासनाकडे हस्तांतरित अंबरनाथ नगरपरिषदेचे कै. डॉ. बी.जी.छाया रूग्णालय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हे रुग्णालय ६५ खाटांचे आहे. रुग्णालय अधिक सक्षमपणे चालावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेने आधी तसा ठराव केलेला होता. या निर्णयानुसार रूग्णालयाच्या मालकी हक्कासह संबंधित भूखंड, त्यावरील इमारत, यंत्रसामग्री (दायित्व वा बोजाविरिहत ) सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली असून रुग्णालयाचे कर्मचारीही शासनाकडे वर्ग झाले आहेत. शेळगाव प्रकल्पास सुधारित मान्यताजळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास ६९९ कोटी ४८ लाख रुपये खर्चाची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाद्वारे तापी खोऱ्यातील ४.५ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. त्यातून यावल तालुक्यातील ९ हजार १२८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.नवीन नगरपालिकांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीराज्यात नवीन नगरपालिका आणि नगर पंचायती निर्माण करण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने राज्य सरकारवर किती आर्थिक भार पडेल याचा अभ्यास ही उपसमिती करेल.