शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

शासकीय खरेदीत केंद्रीय कंपन्यांना सवलत

By admin | Updated: October 19, 2016 06:15 IST

स्तूंच्या खरेदीसाठीच्या धोरणात २७ प्रकारच्या सुधारणा करून हे धोरण अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.

मुंबई : राज्य शासनाची विविध कार्यालये, शासकीय उपक्रम आणि स्वायत्त संस्थांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठीच्या धोरणात २७ प्रकारच्या सुधारणा करून हे धोरण अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध कंपन्या आतापर्यंत अशा प्रकारच्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास फारशा इच्छुक नसत. कारण, बयाणा रक्कम भरावी लागत असे. ती त्यांना परवडणारी नव्हती. तसेच, खासगी कंपन्यांना या खरेदीपोटी आगाऊ रक्कम दिली जाते पण केंद्र सरकारी कंपन्यांना ती दिली जात नव्हती. या दोन्ही कारणांमुळे दर्जेदार मालाचे उत्पादन करणाऱ्या केंद्र सरकारी कंपन्या राज्यामध्ये निविदाच भरत नसत. आज केलेल्या सुधारणांनुसार केंद्र सरकारी कंपन्यांकडून आता अशी बयाणा रक्कम घेतली जाणार नाही. तसेच त्यांना आगाऊ रक्कमदेखील देण्यात येणार आहे. या शिवाय, राज्य वा केंद्र सरकारच्या विविध कंपन्या वा उपक्रम ज्या वस्तूंचे उत्पादन करतात त्यांच्या खरेदीसाठी स्वतंत्रपणे निविदा काढण्यात येतील. या कंपन्या उत्पादन करीत नसलेल्या वस्तूंच्या सोबत निविदा काढण्यात येणार नाहीत. खरेदीची पद्धत अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. त्यातील मानवी हस्तक्षेप कमीतकमी करून संगणकीय वापरावर भर देण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)>अंबरनाथ रूग्णालय शासनाकडे हस्तांतरित अंबरनाथ नगरपरिषदेचे कै. डॉ. बी.जी.छाया रूग्णालय शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हे रुग्णालय ६५ खाटांचे आहे. रुग्णालय अधिक सक्षमपणे चालावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेने आधी तसा ठराव केलेला होता. या निर्णयानुसार रूग्णालयाच्या मालकी हक्कासह संबंधित भूखंड, त्यावरील इमारत, यंत्रसामग्री (दायित्व वा बोजाविरिहत ) सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली असून रुग्णालयाचे कर्मचारीही शासनाकडे वर्ग झाले आहेत. शेळगाव प्रकल्पास सुधारित मान्यताजळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास ६९९ कोटी ४८ लाख रुपये खर्चाची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाद्वारे तापी खोऱ्यातील ४.५ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. त्यातून यावल तालुक्यातील ९ हजार १२८ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.नवीन नगरपालिकांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीराज्यात नवीन नगरपालिका आणि नगर पंचायती निर्माण करण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने राज्य सरकारवर किती आर्थिक भार पडेल याचा अभ्यास ही उपसमिती करेल.