शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

वाशिम बाजार समिती बरखास्त

By admin | Updated: January 16, 2017 20:39 IST

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एकूण १७ निर्वाचित संचालकांनी कलम ४५ ची अपात्रता धारण केल्याने १७ संचालकांना पदावरुन कमी करण्यात येवून वाशिम बाजार समिती बरखास्त करण्यात येत असल्याचा आदेश

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 16 - वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एकूण १७ निर्वाचित संचालकांनी कलम ४५ ची अपात्रता धारण केल्याने १७ संचालकांना पदावरुन कमी करण्यात येवून वाशिम बाजार समिती बरखास्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक डी.आर. खाडे यांनी १६ जानेवारी रोजी दिला. कोरमअभावी समिती वैधानिकदृष्टया गठीत होत नसल्याने कृषि उत्पन्न बाजार समितीचे नियमित कामकाज करण्याकरिता कार्यालय अधिक्षक जी.बी.राठोड यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे खाडे यांनी आपल्या आदेशात नमूद केले.बाजार समितीचे आडते गिरधर रामेश्वर सारडा यांनी ५२ आडते व खरेदीदार यांच्यासह गोडावूनची मागणी करुनही बाजार समितीने गोडावून न दिल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे केली होती. तसेच तज्ज्ञ संचालक बंडू विठ्ठल महाले व आनंद तुळशिराम मालपाणी यांनी विविध कामांची चौकशी करण्याबाबत उपनिबंधकांना तक्रार दिली होती. याशिवाय संचालक कृषि पणन मंडळ पुणे या कार्यालयाने वाशिम बाजार समिती विरोधात योग्य ती चौकशी करून कारवाईच्या सूचना उपनिबंधकांना दिल्या होत्या. या सर्व बाजूंचा विचार व युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी, महाराष्ट्र शासनाच्या ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीमय) अधिनियम १९६३ चे कलम ४५ (१) नुसार कृषि उत्पन्न बाजार समितीतील निर्वाचित १७ संचालकांना अपात्र ठरविण्याचा आदेश १६ जानेवारी रोजी दिला. सदरहू आदेशात खाडे यांनी वाशिम कृषि उत्पन्न बाजार समिती विरोधातील तक्रारी पाहता संचालक मंडळास वारंवार सुचना देवूनही संबंधित तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यास संचालक मंडळ सक्षम नाही तसेच १० डिसेंबर २०१५ च्या संचालक मंडळाच्या बैठकीतील विषय क्रमांक ४(अ) व ठराव ४(अ) नुसार शोभा दामोदर काळे वगळून एकूण १७ निर्वाचित संचालकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या असून बाजार समिती संचालक मंडळाने कलम १२ (१) चे उल्लंघन केले तसेच बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याची खात्री झाल्यामुळे, सदर १७ निर्वाचित संचालक अपात्र ठरवित असल्याचे आदेशात म्हटले.बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयामुळे जिल्हयातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.