शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

इंग्रजी शिक्षणामुळे मराठीचा लोप

By admin | Updated: January 18, 2016 00:50 IST

मुलांचे शिक्षण मराठीत असावे की नाही, मराठी हा विषय शालेय शिक्षणात असावा का, हे चर्चेचे विषय मागे पडू लागले आहेत. पालक नेहमी मुलांच्या दृष्टीने विचार करतात

नीलेश जंगम , ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)मुलांचे शिक्षण मराठीत असावे की नाही, मराठी हा विषय शालेय शिक्षणात असावा का, हे चर्चेचे विषय मागे पडू लागले आहेत. पालक नेहमी मुलांच्या दृष्टीने विचार करतात व त्यांना इंग्रजीतून शिक्षण देतात. या मूळ कारणामुळे मराठी भाषा व्यवहारातून लोप पावत आहे, असा ओहापोह ‘मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारात मराठी भाषा’ या परिसंवादातून करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात (उपमंडपात) या परिसंवादाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी बाळकृष्ण कवठेकर होते. शैलेश पांडे, डॉ, जयद्रथ जाधव, अनुराधा ठाकूर, वैशाली पत्की, डॉ. शैलजा जोशी, आनंद पाटील या वक्त्यांनी परिसंवादात विचार मांडले. उपस्थितांचा स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी या विषयी शासनाचे धोरण काय आहे, हे सांगितले. संपूर्ण व्यवहार मराठीतून होण्यासाठी भाषा संचालनालयाची गरज आहे. याबाबत विविध कोष, शब्दावल्या त्यांनी सांगितल्या. भाषेचे धोरण राबविणारी एक मराठी समिती आहे. ज्ञानव्यवहारात कोष तयार केला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाने मराठीची कास सोडता कामा नये, असा सल्लाही त्यांनी दिला. मराठीएवढा उत्सव कोणत्याही भाषेत होत नाही. तरीही आपल्याला संवाद साधावा लागतो, असा निराशेचा सूर लावण्यापेक्षा काळजी व चिंता केली पाहिजे. मराठी भाषेत व्यवहार होत राहिला, तरच व्यवहारात मराठी भाषा राहील. माध्यमांच्या स्थानात मराठीचे स्थान दुय्यम आहे. मराठीची जपणूक करणे, तिचा सन्मान करणे, तिची व्यवहारात प्रतिष्ठापना करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दुजाभाव हा मराठीसाठी अडथळा ठरत आहे. व्यवहारात तिला लोकांनी पहिले स्थान दिले पाहिजे, असे शैलेंद्र पांडे यांनी सांगितले.आनंद पाटील म्हणाले, ‘‘मराठी भाषेविषयी सर्व जण चिंता करीत आहेत, ही परिस्थिती शोभणीय आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. याचा विचार करू, तेव्हा मराठी भाषेचा विकास होईल. व्यवहारातही मराठी भाषेचा वापर केल्यास काळजी करण्याची गरजच नाही. मराठी ही मातृभाषा आहे, अस्मिता आहे, याचा अभिमान आहे. राज्यभाषा आहे, मग व्यवहाराची भाषा का असू नये? यासाठी मराठी माणूसच कमी पडत आहे.’’हिंदी राज्यभाषा, इंग्रजी सहायक, तर मराठी ही क्षेत्रीय भाषा समजली जाते. बँकेकडून व्यवहार मराठीतून करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संकेत, फलक, सूचना, सेवा, उत्पादन, शिक्के मराठीत आहेत. एटीएम यंत्रामध्येही मराठी भाषा आहे. मोबाइल बँकिंगमध्येही मराठीतून सूचना आहेत. भाषा हे उद्दिष्ट नाही. भाषा हे माध्यम आहे. संवाद साधण्यासाठी भाषेची निर्मिती झाली आहे. मराठी भाषा उत्तमपणे व्यवहारात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे अनुराधा ठाकूर यांनी सांगितले.मराठीचे प्रेम व कळक ळ प्रत्येकाच्या मनात असली, तरच मराठी भाषेचा विस्तार होईल, असे मत वैशाली पत्की यांनी व्यक्त केले. डॉ. शैलजा जोशी म्हणाल्या, ‘‘मानवी जीवनात भाषेचे महत्त्व आहे. भाषा ही मुखावाटे व्यक्त होणारी मौखिक क्रिया आहे. व्यवहाराची भाषा बदलली की, वास्तव बदलते.’’