शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सत्तेसाठी विस्कळीत धडपड

By admin | Updated: November 13, 2014 01:34 IST

भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी शिवसेना शेवटच्या क्षणार्पयत धडपड करीत राहिली़ मात्र भाजपाने सगळ्या गोष्टी ठरवल्यानुसार पार पाडल्या आणि सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले.

मुंबई : भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी शिवसेना शेवटच्या क्षणार्पयत धडपड करीत राहिली़ मात्र भाजपाने सगळ्या गोष्टी ठरवल्यानुसार पार पाडल्या आणि सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावे लागले. सत्तेजवळ जाण्याची धडपड शेवटच्या क्षणी एवढी वाढली की नव्या अध्यक्षांच्या अभिनंदनाची भाषणो सुरू असतानाही सेनेच्या आणि भाजपाच्या बाकावरून चिठ्ठय़ांचे आदानप्रदान सुरू होते.
सकाळी रामदास कदम यांनी शिवसेना विरोधात बसणार, असे जाहीर केले. त्यानंतर काही वेळातच मिलिंद नाव्रेकर विधान भवनात आले. हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले. तेथे पुन्हा चर्चा सुरू झाली. दरम्यान, सभागृहाची वेळ झाली. भाजपा नेते सभागृहात आले तेव्हादेखील खाणाखुणा, चिठ्ठी पाठवणो, सभागृहाबाहेर जाणो असे प्रकार सुरू होते. 
खासदार अनिल देसाई यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, हे कळताच सेनेच्या खासदारांचा एक गट प्रचंड अस्वस्थ झाला. राज्यमंत्री आपण घ्यायचे नाही, असे कारण पुढे करीत या गटाने टोकाची भूमिका घेतल्यानेच देसाई यांना दिल्ली विमानतळावरूनच मुंबईला परतावे लागले. दुसरीकडे राज्यात 15 वर्षानंतर सत्ता मिळत असताना ती का नाकारायची, असे सांगत आमदार आक्रमक झाले. नीलम गो:हे, दिवाकर रावते, रामदास कदम, सचिन सावंत या विधान परिषद सदस्यांना मंत्री व्हावे, असे तीव्रतेने वाटत होते. तर सेनेत तिसरा गट निष्ठावंत होता, ज्यांना सुरू असलेले सगळे नाटय़ लाचारीचे वाटत होते. त्यांना शिवसेनेचा स्वाभिमान गहाण टाकून सत्ता नको होती.
सभागृहाबाहेर या सर्व रस्सीखेचात खा. संजय राऊत, मिलिंद नाव्रेकर, सुभाष देसाई यांच्या भूमिका पक्षाला मदत करणा:या आहेत की विरोधात, हे स्पष्ट होत नव्हते.  सकाळी विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होत असतानादेखील शिवसेनेचेच काही सदस्य कशाला एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत, असे बोलत होते. लाल दिव्याची गाडी आपल्याला न मिळता एकटय़ा शिंदेंना मिळते आहे, हे देखील त्या नाराजीचे एक कारण होते. विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतरही सेनेच्या चेह:यावर आनंदाऐवजी हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेल्याचेच दु:ख अधिक होते. ही अस्वस्था इतकी टोकाची होती की राज्यपालांच्या अभिभाषणावेळी देखील काँग्रेस घोषणाबाजी करीत होती, राष्ट्रवादी शांत बसून होती आणि विरोधी पक्षाचे माप पदरात पाडून घेणा:या शिवसेनेने करायचे तरी काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या चेह:यावर होता. (प्रतिनिधी)
 
च्सकाळी विश्वासदर्शक ठरावावेळी देखील ज्या पद्धतीचे फ्लोअर मॅनेजमेंट करायला पाहिजे होते, ते देखील सेनेने केले नव्हते. पोल मागायचा तो नेमका कोणत्या वेळी, यावरूनही गोंधळ उडाला होता.
च्मतदान मागायचे होते तर विधानसभेत वेलमध्ये न उतरता सगळ्यांनी मोठय़ा आवाजात तेवढीच मागणी लावून धरली असती, तरी अध्यक्षांना पुढे जाता आले नसते. मात्र अशा संकटकाळी नेमके काय करायचे याचे नियोजनच सेनेच्या आमदारांजवळ नव्हते.
च्सभागृहाबाहेर या सर्व रस्सीखेचीत खा. संजय राऊत, मिलिंद नाव्रेकर, सुभाष देसाई यांच्या भूमिका पक्षाला मदत करणा:या आहेत की विरोधात, हे स्पष्ट होत नव्हते. नाव्रेकर यांचा तेथे असणारा वावर सगळ्यांच्या भुवया उंचावणारा होता. सकाळी विरोधी पक्षनेते पदाची निवड होत असतानादेखील शिवसेनेचेच काही सदस्य कशाला एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत, असे बोलत होते.