शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

गावांचे नामफलक नसल्याने गैरसोय

By admin | Updated: May 17, 2016 02:46 IST

निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.

करंजगाव : निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. मात्र, बहुतेक गावांत नामफलक नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. अनेकदा दिशाभूल होऊन त्यांचा वेळ वाया जातो.नाणे मावळातील जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत आदी गावांत नामफलक नसल्याने नवख्या माणसांना गावाचे नाव विचारावे लागते. प्रत्येक गावाचे नाव दर्शविणारे फलक प्रमुख रस्त्यावर किंवा गावाकडे जाणाऱ्या उपरस्त्यांवर असणे अपेक्षित आहे. जांभवली येथे काही अंतरावर कोंडेश्वर मंदिर, ढाक बहिरी, सोमवडी येथे टाटा धरण, उंबरवाडी येथे शिवकालीन वाघेश्वर मंदिर, गोवित्री येथे पशुवैद्यकीय दवाखाना, गोवित्री-साबळेवाडी फाटा येथे संत तुकाराम पादुका मंदिर, करंजगाव येथे कमळाचे प्राचीन तळे, शाळा, करंजगाव-कोंडिवडे यांच्या हद्दीतले परागमंदिर, उकसान येथे वडिवळे धरण, साईच्या डोंगरावरील पवनचक्क्या आहेत. इतर गावांमध्ये अनेक शाळा, दवाखाना, छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय असून, येथे शिवकालीन मंदिरे मोठ्या संख्येने आहेत. सर्वांत महत्त्वाचे येथील डोंगर खूप उंच आहेत. झाडीही अत्यंत दाट आहे. धरण, नदी असल्यामुळे येथील जमीन सुजलाम् सुफलाम् आहे. त्यामुळे या परिसरात विशेषत: रविवारी पर्यटकांची गर्दी जास्त असते. वाहतूक सुरू असते. प्रवासी, पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी विचारत पुढे जावे लागते. प्रशासनाने नामफलक बसवावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)