शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गावांचे नामफलक नसल्याने गैरसोय

By admin | Updated: May 17, 2016 02:46 IST

निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.

करंजगाव : निसर्गसौंदर्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नाणे मावळकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. मात्र, बहुतेक गावांत नामफलक नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. अनेकदा दिशाभूल होऊन त्यांचा वेळ वाया जातो.नाणे मावळातील जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नाणोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत आदी गावांत नामफलक नसल्याने नवख्या माणसांना गावाचे नाव विचारावे लागते. प्रत्येक गावाचे नाव दर्शविणारे फलक प्रमुख रस्त्यावर किंवा गावाकडे जाणाऱ्या उपरस्त्यांवर असणे अपेक्षित आहे. जांभवली येथे काही अंतरावर कोंडेश्वर मंदिर, ढाक बहिरी, सोमवडी येथे टाटा धरण, उंबरवाडी येथे शिवकालीन वाघेश्वर मंदिर, गोवित्री येथे पशुवैद्यकीय दवाखाना, गोवित्री-साबळेवाडी फाटा येथे संत तुकाराम पादुका मंदिर, करंजगाव येथे कमळाचे प्राचीन तळे, शाळा, करंजगाव-कोंडिवडे यांच्या हद्दीतले परागमंदिर, उकसान येथे वडिवळे धरण, साईच्या डोंगरावरील पवनचक्क्या आहेत. इतर गावांमध्ये अनेक शाळा, दवाखाना, छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय असून, येथे शिवकालीन मंदिरे मोठ्या संख्येने आहेत. सर्वांत महत्त्वाचे येथील डोंगर खूप उंच आहेत. झाडीही अत्यंत दाट आहे. धरण, नदी असल्यामुळे येथील जमीन सुजलाम् सुफलाम् आहे. त्यामुळे या परिसरात विशेषत: रविवारी पर्यटकांची गर्दी जास्त असते. वाहतूक सुरू असते. प्रवासी, पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी विचारत पुढे जावे लागते. प्रशासनाने नामफलक बसवावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)