शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

वंचित बेघर कुटुंबांचा घेतला जातोय शोध

By admin | Updated: September 22, 2015 01:53 IST

जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागांतील बेघर व दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना इंदिरा आवास योजनेद्वारे घरकुले देण्यात आली आहेत

ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागांतील बेघर व दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना इंदिरा आवास योजनेद्वारे घरकुले देण्यात आली आहेत. यामुळे बेघर कुटुंबे आता जिल्ह्यात शिल्लक राहिली नाहीत. तरीदेखील, प्रतीक्षा यादींमध्ये शिल्लक असलेल्या बेघर कुटुंबीयाचा शोध घेऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. आदिवासी, मागासवर्गीय कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरकुलांपासून कोणीही उपेक्षित राहिले नाही. त्यानुसार, या वर्षाचा घरकुल निधी स्वीकारण्यात आला नसल्याचे प्रकल्प अधिकारी आर.के. बामणे यांनी नमूद केले. परंतु, पुढील वर्षाचा निधी स्वीकारण्याच्या दृष्टीने प्रतीक्षा यादीतील उपेक्षितांचा शोध घेऊन त्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सुमारे एक लाख रुपये खर्चाच्या या घरकुलासाठी शासनाकडून ९५ हजार रुपये अनुदान मिळते. उर्वरित रुपये लाभार्थ्याने भरायचे किंवा बांधकामासाठी अंगमेहनत करायची. याप्रमाणे जिल्ह्यात घरकुलांचा लाभ देण्यात आलेला आहे. यामुळे घरकुलापासून कोणीही वंचित राहिलेले नाही. तरीही, प्रतीक्षा यादीतील कुटुंबांची चौकशी करून वंचितांना शोधले जात आहे.