शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

विशेष सवलतीपासून शेतकरी वंचित

By admin | Updated: September 9, 2015 03:27 IST

शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी दिले जाते; मात्र या योजनेचा फायदा राष्ट्रीयीकृती बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे.

अकोला : शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी दिले जाते; मात्र या योजनेचा फायदा राष्ट्रीयीकृती बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत असतानाच राज्य व केंद्राच्या हिश्शातील ४ टक्के व्याजाची परतफेड होत नसल्याने बिनव्याजी कर्जावरही शेतकऱ्यांच्या खिशातून ४ टक्के व्याजाची आकारणी होतआहे. राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सलवत योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सलवत दिली जाते. त्याची परतफेड राष्ट्रीयीकृत बँकांसोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातूनही होते. जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून पीक कर्जावर ६ टक्के व्याज आकारणी होते. त्यापैकी ३ टक्के व्याज परतावा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून मिळतो, तसेच उर्वरित ३ टक्के व्याज परतावा नाबार्डच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी मिळते. त्याचवेळी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र त्याच पीक कर्जासाठी ७ टक्के व्याज आकारणी केली जाते. त्यातील ३ टक्के व्याजाचा परतावा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केला जातो.उर्वरित ४ टक्के व्याजाचा परतावा करण्यासाठी राज्य शासनाने १ टक्का व केंद्र सरकारने ३ टक्के हिस्सा उचलावा, असा नियम आहे; मात्र या नियमाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेकडून १ लाखापर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज दर भरावा लागत असून, त्यांना बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभच मिळत नसल्याचे वास्तव आहे.