शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आमिर खानच्या घरासमोर कडेकोट सुरक्षा

By admin | Updated: November 24, 2015 17:59 IST

अभिनेता आमिर खानने देश सोडून जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, अमिर खानच्या घरासमोर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अभिनेता आमिर खानने देश सोडून जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, अमिर खानच्या घरासमोर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमिरच्या घरासमोर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
आम्ही आमिर खानच्या घरोसमोर पुरेसा पोलीस बंदोबस्त केला आहे. मुंबईत किंवा आमिरच्या घराजवळ कोणत्याही प्रकारची निदर्शने होऊ नयेत याची काळजी घेण्यात आली असून अमिरच्या घरासमोर घोषणाबाजी करणा-या पाच हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलीसांनी सांगितले. 
सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात आमिरने देशातील वाढत्या असहिष्णूतेविरोधात वक्तव्य केले. यावेळी त्याने 
 या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले. आपली निराशा व्यक्त करण्यासाठी प्रतिभावंत मंडळींसाठी पुरस्कारवापसी हा एक मार्ग असू शकतो, अशा शब्दांत आमिरने त्यांना पाठिंबा दर्शवला.
' या देशात काय घडतयं ते आम्ही रोज वृत्तपत्रातून वाचत असतो, पहात असतो. गेल्या काही महिन्यात देशात घडलेल्या घटनांबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत ते धक्कादायक आहेत. जे घडतयं, त्यामुळे मी चिंतित झालो, हे नाकबूल करणार नाही. विशेषत: गेल्या सहा ते आठ आठवड्यात देशातील असुरक्षितता, भय वाढले आहे' असे आमिर म्हणाला. 'आपण भारत सोडूया का असा प्रश्न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. सभोवतालच्या वातावरणामुळे ती चिंतातुर झाली, मुलांची तिला काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्न विचारणे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला. 
यावेळी त्याने राजकारण्यांवरही निशाणा साधला. आपवी काळजी घेण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकांनी, नेत्यांनी खंबीरपणे पावले उचलणे, कायदा हातात घेणा-याविरोधात कडक कारवाई करणे अपेक्षित असते. पण ते होत नसल्यामुळेच असुरक्षिततेची भावना वाढत चालली असल्याचे सांगत त्याने राजकारण्यांवर टीका केली. 
दरम्यान, दुसरीकडे आमिरने केलेल्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.