शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या तहसीलदार कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: September 10, 2016 03:13 IST

सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली.

आकाश गायकवाड,

डोंबिवली- सार्वजनिक स्वच्छतेवर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या अभियानाचे नियंत्रण त्यात्या शहरांचे तहसीलदार तसेच महापालिकांवर सोपवण्यात आली आहे. मात्र, ऐतिहासिक कल्याण शहराच्या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातच घाणीचे साम्राज्य आहे. या परिसरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यातील कर्मचारी व येथे येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसराची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकानजीक तहसीलदार कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात महात्मा फुले चौक पोलीस ठाणेही आहे. कार्यालयाच्या मागे कल्याण येथील पोलिसांचा सोनसाखळी चोरीप्रतिबंधक विभाग, गुन्हे अन्वेषण शाखा आदी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज कल्याण-डोंबिवली शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून महसुली तसेच पोलीस ठाण्याच्या कामांसाठी शेकडो नागरिक येतात. तहसील कार्यालयाच्या आवारात मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहाची कित्येक दिवस स्वच्छताच करण्यात आलेली नाही. शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे. त्यातील नळ, दरवाजेही तुटलेले आहेत. अनेकदा पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होते. अन्यत्र शौचालय नसल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांना नाक दाबूनच शौचालयात जावे लागत आहे. काही जण तेथे आडोसा शोधून लघुशंका करत असल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली. त्यामुळे महिला त्रस्त आहेत.तहसील कार्यालयामागील बाजूस पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दुचाकी ठेवल्या आहेत. या गाड्या अनेक वर्षांपासून तेथे पडल्याने त्यांना गंज चढला आहे. या परिसरातील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कूलर व शुद्ध पाणी पिण्याची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना बाटलीबंद पाणी विकत आणावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना सायंकाळी व रात्री डासांच्या उपद्रवाला सामोरे जावेलागते. उंदीर आणि घुशींनी तर संपूर्ण कोपरे पोखरून काढले आहेत. सध्या पावसाळ्यात काही कार्यालयांत गळती लागली आहे. ओलाव्यामुळे भिंतींचेपापुद्रेनिघाले आहेत. तसेच कुबट दर्पामुळे कर्मचारी व अधिकारी आजारी पडत आहेत. कार्यालयातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली आहेत. तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील घाण व दुर्गंधीमुळे पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला एक प्रकारे हरताळच फासला गेला आहे. या कार्यालयाच्या आवारातच स्वच्छता नसेल, तर येथील अधिकारी शहराची काय स्वच्छता ठेवणार?- दीपक गुप्ता, विद्यार्थी.