शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

भाषा संचालनालयाला ‘पूर्णवेळ’ वाली नाहीच

By admin | Updated: June 9, 2017 05:22 IST

सरकार बदलल्यानंतर ‘मराठी’ला अच्छे दिन येणार असे आमिष दाखवणाऱ्या राज्य शासनाचा प्रत्यक्ष कारभार ‘बुरे दिन’ प्रमाणेच सुरू आहे.

स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकार बदलल्यानंतर ‘मराठी’ला अच्छे दिन येणार असे आमिष दाखवणाऱ्या राज्य शासनाचा प्रत्यक्ष कारभार ‘बुरे दिन’ प्रमाणेच सुरू आहे. सत्तेत आल्यानंतर मराठी भाषा विभाग कात टाकेल, मराठीला नवी उभारी मिळेल हे आता स्वप्नच राहिले आहे. राज्य शासनामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा भाषा संचालनालयाला ‘पूर्णवेळ’ वाली नसल्याचे उघड झाले आहे. भाषा संचालकपदी प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्याचा भार आता अवर सचिवांच्या खांद्यावर दिला असून मराठी भाषेला ‘अच्छे दिन’ नाहीच हे पुन्हा यातून दिसून आले आहे.मराठी भाषा विभागात भाषा संचालनालयातील भाषा संचालकपदी औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यापिका मंजडॉ.ुषा कुलकर्णी यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ३० मे २०१५ ते ३१ मे २०१७ हा डॉ. कुलकर्णी यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने त्यांना आता अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत साहाय्यक प्राध्यापक पदावर सेवेत रुजू होण्याविषयी नुकताच राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. यामुळे पुन्हा एकदा भाषा संचालनालयाचा कारभार मराठीभाषा विभागाचे अवर सचिव हर्षवर्धन जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. २०११ सालापासून आतापर्यंत भाषा संचालकाचे पद रिक्त आहे. २०११ साली नोव्हेंबर महिन्यात गौतम शिंदे यांनी ९-१० महिन्यांच्या कालावधीसाठी संचालकपद भूषविले होते. त्यानंतर मात्र भाषा संचालनालयाचा हा कारभार केवळ अतिरिक्त जबाबदारीवर सुरू ठेवला आहे. यापूर्वी २०१२ मध्येही भाषा संचालक, उपसंचालक, साहाय्यक भाषा संचालक, भाषा अधिकारी आदी पदांसाठीही उमेदवार न मिळाल्याने सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला होता. नच्यने काढण्यात आलेल्या अध्यादेशात दुरुस्तीनंतरही प्रशासकीय सेवेतील दीर्घ अनुभव असलेला, संस्कृत पदवीधर, अनुवादाचा किंवा परिभाषा कोश निर्मितीचा किंवा शब्दावली-शब्दकोश निर्मितीचा ७ वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती भाषा संचालकाच्या पदासाठी न मिळाल्याने २०१२मध्ये यात बदल करून अनुवादाचा अनुभव पाच वर्षांचा असावा, अशी अट शिथिल करण्यात आली होती. त्यानंतर जाहिरात दिल्यावरही एकही उमेदवार मिळाला नव्हता.>तावडेंचे दुर्लक्षचभाषा संचालनालयासाठी योग्य माणूस पाहिजे हे अजून सरकारला कळले नाही, हे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडेंचे अपयश आहे. यामुळे पुन्हा एकदा सरकारची मराठीप्रतिची उदासीनता उघड झाली आहे. विभागाप्रति असणाऱ्या ढिसाळ कारभारामुळे हा विभाग इतिहासजमा होणार आहे. तावडेंच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नागनाथ कोतापल्लेंपासून मराठी भाषा धोरणावर तयार झालेला मसुदा धूळ खात आहे. मराठी भाषेविषयीच्या सरकारच्या गंभीर अनास्थेमुळे भाषेची प्रगंती खुंटते आहे.- डॉ. दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्रसप्टेंबर २००२ पासून ते आॅगस्ट २०१० पर्यंत भाषा संचालकपद भरलेले नव्हते. पदासाठी योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे संचालकाचा प्रभार (कार्यासन २०-ब) च्या उपसचिवांकडेच दिला जात आहे.या उपसचिवांच्या बदल्या होत राहतात, अशा रीतीने गेल्या आठ वर्षांत सुमारे १२ वेळा भाषा संचालनालयाचे भाषा संचालक बदलले.