शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

क्लासेसचे संचालक संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 04:54 IST

पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

राजू ओढे,ठाणे-  पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परीक्षार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात या क्लासेसचे संचालकही मुख्य भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे.सैन्य भरती मंडळातर्फे २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात घेतलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या २१ आरोपींमध्ये सैन्य दलाच्या ४ आजीमाजी कर्मचाऱ्यांसह स्पर्धा परीक्षेची शिकवणी घेणाऱ्या क्लासेसच्या संचालकाचाही समावेश आहे. या टोळीची काम करण्याची पद्धत अतिशय सूत्रबद्ध आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी किमान २/४ वर्षे संचालकांच्या संपर्कात असतात. त्यापैकी बौद्धिक क्षमता तुलनात्मकदृष्ट्या कमी आणि खर्च करण्याची क्षमता जास्त असलेले विद्यार्थी हे संचालक हेरतात.या घोटाळ्यातून या टोळीची एकूणच कार्यपद्धती स्पष्ट झाली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक दिवस आधी हाती लागल्यानंतर टोळीच्या प्रमुखांनी ती नागपूर, पुणे आणि गोवा येथील त्यांच्या हस्तकांपर्यंत पोहोचवली. तत्पूर्वी इच्छुक परीक्षार्थ्यांसोबत खर्चाबाबत बोलणी झालेली होतीच. इच्छुक परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या जवळपास मोठी निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी एक दिवस आधी एकत्र करण्यात आले होते. खबरदारी म्हणून सर्व परीक्षार्थ्यांनाचे मोबाइल फोन आणि त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती टोळीतील सदस्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर, सर्व परीक्षार्थ्यांनाना वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रती (उत्तरासह) देण्यात आल्या. परीक्षार्थ्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांची झोपण्याची व्यवस्था तिथेच करण्यात आली. येथून बाहेर पडण्याची परवानगी परीक्षार्थ्यांना देण्यात आली नव्हती. परीक्षा केंद्रांवर जाण्यास किती वेळ लागतो, याचा अंदाज घेऊन परीक्षार्थ्यांना सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती त्याची अंतिम निवड होईपर्यंत त्याला परत दिल्या जात नाहीत. आरोपींकडून एवढी खबरदारी घेतली जात असल्याने वर्षानुवर्षे हा घोटाळा बिनदिक्कतपणे सुरू होता, अशी माहिती तपासातून समोर येऊ लागली आहे.