शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

क्लासेसचे संचालक संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 04:54 IST

पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

राजू ओढे,ठाणे-  पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परीक्षार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात या क्लासेसचे संचालकही मुख्य भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे.सैन्य भरती मंडळातर्फे २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात घेतलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या २१ आरोपींमध्ये सैन्य दलाच्या ४ आजीमाजी कर्मचाऱ्यांसह स्पर्धा परीक्षेची शिकवणी घेणाऱ्या क्लासेसच्या संचालकाचाही समावेश आहे. या टोळीची काम करण्याची पद्धत अतिशय सूत्रबद्ध आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी किमान २/४ वर्षे संचालकांच्या संपर्कात असतात. त्यापैकी बौद्धिक क्षमता तुलनात्मकदृष्ट्या कमी आणि खर्च करण्याची क्षमता जास्त असलेले विद्यार्थी हे संचालक हेरतात.या घोटाळ्यातून या टोळीची एकूणच कार्यपद्धती स्पष्ट झाली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक दिवस आधी हाती लागल्यानंतर टोळीच्या प्रमुखांनी ती नागपूर, पुणे आणि गोवा येथील त्यांच्या हस्तकांपर्यंत पोहोचवली. तत्पूर्वी इच्छुक परीक्षार्थ्यांसोबत खर्चाबाबत बोलणी झालेली होतीच. इच्छुक परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या जवळपास मोठी निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी एक दिवस आधी एकत्र करण्यात आले होते. खबरदारी म्हणून सर्व परीक्षार्थ्यांनाचे मोबाइल फोन आणि त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती टोळीतील सदस्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर, सर्व परीक्षार्थ्यांनाना वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रती (उत्तरासह) देण्यात आल्या. परीक्षार्थ्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांची झोपण्याची व्यवस्था तिथेच करण्यात आली. येथून बाहेर पडण्याची परवानगी परीक्षार्थ्यांना देण्यात आली नव्हती. परीक्षा केंद्रांवर जाण्यास किती वेळ लागतो, याचा अंदाज घेऊन परीक्षार्थ्यांना सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती त्याची अंतिम निवड होईपर्यंत त्याला परत दिल्या जात नाहीत. आरोपींकडून एवढी खबरदारी घेतली जात असल्याने वर्षानुवर्षे हा घोटाळा बिनदिक्कतपणे सुरू होता, अशी माहिती तपासातून समोर येऊ लागली आहे.