शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सर्व घटकांचा भ्रमनिराश करणारा दिशाहीन अर्थसंकल्प - अशोक चव्हाण

By admin | Updated: March 18, 2017 20:03 IST

अर्थसंकल्प सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असून दिशाहीन आणि शेतकरीविरोधी असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - 'अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे पण कोणत्याही ठोस योजना नाहीत. शेतक-यांना कर्जमाफी न देता वा-यावर सोडले आहे. हा अर्थसंकल्प सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असून दिशाहीन आणि शेतकरीविरोधी असल्याची', टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
 
'अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज साडेचार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे. सलग तिस-या वर्षी सरकारने तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे या वरून या सरकारला आर्थिक शिस्त नसून राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका', अशोक चव्हाण यांनी केली आहे. 'यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांना चांगले उत्पादन झाले होते, मात्र शेतीमालाला भाव मिळत नसल्याने मोठ्या संकटात असलेल्या शेतक-यांसाठी सरकार कर्जमाफीची घोषणा करेल अशी अपेक्षा होती. पण सरकारने राज्यातील शेतक-यांची फसवणूक केली आहे. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर, कामगार यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही उपाययोजना करेल अशी अपेक्षा होती पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी राज्यातील जनतेचा अपेक्षाभंग केला',  असे चव्हाण म्हणाले.   
 
'तरूण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची आणि निधीची अपेक्षा होती. पण सरकारने या सर्व घटकांना निराश केले आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगारी कमी करण्यासंदर्भात कुठलीही नवी योजना जाहीर केली नाही. महिला विकास आणि सुरक्षेसाठी या अर्थसंकल्पात कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हातात काहीही पडले नसून राज्याला अधोगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे', असं अशोक चव्हाण बोलले आहेत.