शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

दिनकर रायकर यांना जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार

By admin | Updated: January 28, 2015 17:52 IST

दै. लोकमतचे समूह संपादक श्री. दिनकर केशव रायकर यांना राज्य शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - दै. लोकमतचे समूह संपादक श्री. दिनकर केशव रायकर यांना राज्य शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री. लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी व श्री विजय विश्वनाथ  कुवळेकर यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार असून ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. लक्ष्मण जोशी यांना २०११ सालचा तर कुवळेकर यांना २०१२ सालचा आणि  दिनकर रायकर यांना २०१३ सालचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
दिनकर रायकर यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात ५० वर्षांचा अनुभव असून त्यांनी याआधी इंडियन एक्स्प्रेसचे मुंबई शहर आवृत्तीचे संपादक, दै. लोकमत व लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. सध्या दै. लोकमतचे समूह संपादक असलेल्या रायकर यांना पुढारीकार ग.गो.जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लक्ष्मण जोशी हे सध्या लोकशाही वार्ताचे संपादक असून त्यांनी दै.तरूण भारतमध्ये वार्ताहर पदापासून ते मुख्य संपादक पदापर्यंत काम केले आहे. याशिवाय त्यांनी गोमंतक, गोवादूत, मुंबई तरूण भारत, जळगाव तरूण भारतमध्ये संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.  पत्रकारितेत ४५ वर्षांहून अधिक काळचा अनुभव असलेल्या जोशी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला आहे. 
विजय कुवळेकर यांनी मुख्य संपादक सकाळ, संपादक लोकमत, मुंबई तसेच संपादक सकाळ, कोल्हापूर अशी जबाबदारी सांभाळली आहे. ३३ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेतला अनुभव असलेले कुवळेकर यांना जीवनगौरव रत्नदर्पण, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, कै. सुशीलादेवी देशमुख पुरस्कार मिळाले आहेत.