शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

मालेगाव स्फोट प्रकरणी ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार 8 वर्षांपासून गायब

By admin | Updated: May 20, 2016 19:29 IST

मालेगाव स्फोट प्रकरणी मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलेले दिलीप पाटीदार गायब झाले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 20 - मालेगाव स्फोट प्रकरणी मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलेले दिलीप पाटीदार गायब झाले आहेत. महाराष्ट्र एटीएसने 2008मध्ये कारवाई करत मालेगाव स्फोट प्रकरणी  चौकशीसाठी दिलीप पाटीदार यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानंतर दिलीप पाटीदार यांचं काय झालं ? याची कोणलाच माहिती नाही. गेल्या 8 वर्षापासून दिलीप पाटीदार यांची काहीच माहिती मिळालेली नाही.
 
दिलीप पाटीदार यांचं कुटुंबीय मुंबईत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तपासाची मागणी केली आहे. पाटीदार यांच्या पत्नी पद्मा पाटीदार यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना एटीएसच्या अधिका-यांनी माझ्या पतीला सहज चौकशीसाठी 8 वर्षापुर्वी नेले तेव्हापासून त्यांचा मला काहीच पत्ता लागलेला नाही अशी माहिती दिली आहे. दुस-या दिवशी पतीने फोन करुन मुलाची काळजी घे असं सांगितलं, हा त्यांच्याशी झालेला शेवटचा संवाद असंही पद्मा पाटीदार यांनी सांगितलं आहे.
 
'आम्ही आमच्या सहा महिन्यांच्या बाळासह इंदूरच्या बंगाली चौकातील शांती विहार कॉलनीमध्ये राहत होतो. 11 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिका-यांसह महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) काही अधिकारी आमच्या घरी आले आणि मालेगाव स्फोट प्रकरणी माझ्या पतीला चौकशीसाठी घेऊन गेले. त्यादिवसापासून गेल्या 8 वर्षात माझ्या पतीचा काहीच ठावठिकाणा समजलेला नाही', असं पद्दा पाटीदार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं आहे.
 
महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवावं अशी मागणी दिलीप पाटीदार यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.