शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दिलीप पाटीदार ८ वर्षांपासून बेपत्ता

By admin | Updated: May 21, 2016 05:31 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या गायब होण्यामागे पाटीदार कुटुंबाने महाराष्ट्रातील दोन एटीएस अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्याच्या गृहमंत्रालयाच्या परवानगीची गरज आहे. दिलीप पाटीदार यांची पत्नी पद्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.पद्मा म्हणाल्या की, ११ नोव्हेंबर २००८ रोजी मध्य प्रदेशातून पाटीदार यांना महाराष्ट्र एटीएसने मालेगाव स्फोट प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर दिलीप पाटीदार यांचे काय झाले? याची कोणालाच माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पाटीदार कुटुंबाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सीबीआय तपासात महाराष्ट्र एटीएसचे काही अधिकारी दोषी असल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण इंदूरच्या सीबीआय कोर्टापुढे गेले. मात्र महाराष्ट्र एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याच्या कारणास्तव सीबीआयनेही या प्रकरणात हात झटकले. तपासाला गती मिळावी म्हणून पाटीदार कुटुंबाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र एटीएसच्या त्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने द्यावी, अशी त्यांची मागणी होती. तत्काळ मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली नाही, तर पुन्हा सीबीआय कोर्टात जाण्याचा इशारा दिलीप पाटीदार यांचे भाऊ रामस्वरूप पाटीदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>खुनाचा संशयएटीएस अधिकाऱ्यांनी दिलीप यांचा खून केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत रामस्वरूप म्हणाले की, २००८ साली एटीएसने दिलीपला ताब्यात घेतले. त्या वेळी आठवड्याभरात दिलीपसोबत दोनदा फोनवर बोलणे झाले. काही सेकंदाच्या त्या संवादात दिलीपने केवळ एटीएससोबत मुंबईत असल्याचे सांगितले.मात्र त्या वेळी त्याच्या आवाजातून तो घाबरलेला असल्याचे जाणवले. मात्र दुसऱ्या आठवड्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्या वेळी पोलिसांनी विचारणा केली असता दिलीप निर्दोष असल्याचे समजताच त्याला मुंबईतून मध्य प्रदेशसाठी ट्रेनमध्ये रवाना केल्याचे उत्तर मिळाले. मात्र पोलिसांच्या या उत्तरावर विश्वास नसून त्यांनीच दिलीपचे काही बरे-वाईट केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी केला आहे.