शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दिलीप पाटीदार ८ वर्षांपासून बेपत्ता

By admin | Updated: May 21, 2016 05:31 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या गायब होण्यामागे पाटीदार कुटुंबाने महाराष्ट्रातील दोन एटीएस अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्याच्या गृहमंत्रालयाच्या परवानगीची गरज आहे. दिलीप पाटीदार यांची पत्नी पद्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.पद्मा म्हणाल्या की, ११ नोव्हेंबर २००८ रोजी मध्य प्रदेशातून पाटीदार यांना महाराष्ट्र एटीएसने मालेगाव स्फोट प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर दिलीप पाटीदार यांचे काय झाले? याची कोणालाच माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पाटीदार कुटुंबाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सीबीआय तपासात महाराष्ट्र एटीएसचे काही अधिकारी दोषी असल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण इंदूरच्या सीबीआय कोर्टापुढे गेले. मात्र महाराष्ट्र एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याच्या कारणास्तव सीबीआयनेही या प्रकरणात हात झटकले. तपासाला गती मिळावी म्हणून पाटीदार कुटुंबाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र एटीएसच्या त्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने द्यावी, अशी त्यांची मागणी होती. तत्काळ मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली नाही, तर पुन्हा सीबीआय कोर्टात जाण्याचा इशारा दिलीप पाटीदार यांचे भाऊ रामस्वरूप पाटीदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>खुनाचा संशयएटीएस अधिकाऱ्यांनी दिलीप यांचा खून केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत रामस्वरूप म्हणाले की, २००८ साली एटीएसने दिलीपला ताब्यात घेतले. त्या वेळी आठवड्याभरात दिलीपसोबत दोनदा फोनवर बोलणे झाले. काही सेकंदाच्या त्या संवादात दिलीपने केवळ एटीएससोबत मुंबईत असल्याचे सांगितले.मात्र त्या वेळी त्याच्या आवाजातून तो घाबरलेला असल्याचे जाणवले. मात्र दुसऱ्या आठवड्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्या वेळी पोलिसांनी विचारणा केली असता दिलीप निर्दोष असल्याचे समजताच त्याला मुंबईतून मध्य प्रदेशसाठी ट्रेनमध्ये रवाना केल्याचे उत्तर मिळाले. मात्र पोलिसांच्या या उत्तरावर विश्वास नसून त्यांनीच दिलीपचे काही बरे-वाईट केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी केला आहे.