शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

दिलीप पाटीदार ८ वर्षांपासून बेपत्ता

By admin | Updated: May 21, 2016 05:31 IST

मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत.

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले दिलीप पाटीदार गेल्या ८ वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या गायब होण्यामागे पाटीदार कुटुंबाने महाराष्ट्रातील दोन एटीएस अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्याच्या गृहमंत्रालयाच्या परवानगीची गरज आहे. दिलीप पाटीदार यांची पत्नी पद्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.पद्मा म्हणाल्या की, ११ नोव्हेंबर २००८ रोजी मध्य प्रदेशातून पाटीदार यांना महाराष्ट्र एटीएसने मालेगाव स्फोट प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर दिलीप पाटीदार यांचे काय झाले? याची कोणालाच माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पाटीदार कुटुंबाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सीबीआय तपासात महाराष्ट्र एटीएसचे काही अधिकारी दोषी असल्याचे समोर आले. त्यानंतर हे प्रकरण इंदूरच्या सीबीआय कोर्टापुढे गेले. मात्र महाराष्ट्र एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याच्या कारणास्तव सीबीआयनेही या प्रकरणात हात झटकले. तपासाला गती मिळावी म्हणून पाटीदार कुटुंबाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र एटीएसच्या त्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने द्यावी, अशी त्यांची मागणी होती. तत्काळ मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली नाही, तर पुन्हा सीबीआय कोर्टात जाण्याचा इशारा दिलीप पाटीदार यांचे भाऊ रामस्वरूप पाटीदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)>खुनाचा संशयएटीएस अधिकाऱ्यांनी दिलीप यांचा खून केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत रामस्वरूप म्हणाले की, २००८ साली एटीएसने दिलीपला ताब्यात घेतले. त्या वेळी आठवड्याभरात दिलीपसोबत दोनदा फोनवर बोलणे झाले. काही सेकंदाच्या त्या संवादात दिलीपने केवळ एटीएससोबत मुंबईत असल्याचे सांगितले.मात्र त्या वेळी त्याच्या आवाजातून तो घाबरलेला असल्याचे जाणवले. मात्र दुसऱ्या आठवड्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्या वेळी पोलिसांनी विचारणा केली असता दिलीप निर्दोष असल्याचे समजताच त्याला मुंबईतून मध्य प्रदेशसाठी ट्रेनमध्ये रवाना केल्याचे उत्तर मिळाले. मात्र पोलिसांच्या या उत्तरावर विश्वास नसून त्यांनीच दिलीपचे काही बरे-वाईट केल्याचा आरोप रामस्वरूप यांनी केला आहे.