शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

डिजीधन-निजीधन गरिबांचा आवाज होणार - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: April 14, 2017 15:43 IST

भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल, व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 -  डिजीधनचा जो मंत्र भारत सरकारने देशाला दिला आहे. त्याव्दारे अर्थव्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल, व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात व्यक्त केला. 
 
नागपुरातील मानकारपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी आयोजित ‘भीम आधार अ‍ॅप’ च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार व खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. 
 
पंतप्रधान पुढे म्हणाले,  डॉ. बाबासाहेबांच्या जन्मदिनी मला दीक्षाभूमीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. बाबासाहेबांच्या कल्पनेतील आर्थिक क्रांती साकारण्यासाठी आम्ही
 
"डीजीधन  या योजनेव्दारे भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचे आमचे स्वप्न आहे. मोबाइलच प्रत्येकांची बँक बनावे आणि आपल्या हाताचा अंगठा हा त्या बँकेची चावी बनावी.  असे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाची अपेक्षा आहे. त्या दिशेने आमचा प्रवास सुरू  झाला आहे. त्याचा शुभारंभ बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्घधम्माची दीक्षा घेतली, त्या नागपुरातून होतेय हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. 
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राने आणलेल्या ‘भीम अ‍ॅप’च्या या योजनेच्या शुभारंभालाच महाराष्ट्र शासनाने राज्यातील शंभर गावांत याची अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्राच्या प्रत्येक नवनवीन योजनेला कृती उतरवण्यासाठी महाराष्ट्र सदैव केंद्राच्या पाउलावर पाउल ठेवून पुढे चालेल, याची मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून खात्री देतो, असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
-पंतप्रधान आवास योजनेच्या 21 शहरातील कामाला नागपूर येथून सुरुवात झाली आहे. 2019 पर्यंत राज्यातील सर्व गरिबांना घरे देणार 
-भीम अॅपमुळे देशात पारदर्शक व्यवहार होतील,राज्यांनी या योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत,2018 पर्यंत राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतीत या योजनेला पोहोचवणार.15 हजार ग्रामपंचायत डिजिटल करणार  
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक चिंतनावर आधारित स्वप्न पंतप्रधान मोदीजी साकारत आहेत
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील मुद्दे
- नागपूर जिल्हा देशातील डिजिटल जिल्हा ठरला आहे, ही बाब गौरवाची. नागपूर एज्युकेशन हब होत आहे 
- देश आर्थिक महासतेकडे वाटचाल करत आहे, सर्व ठिकाणी पारदर्शकता येत आहे, ही चांगली सुरुवात आहे
- गरिबांचा विकास होण्याचा उद्देश समोर ठेऊनच डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू झाली आहे, या माध्यमातून गैरप्रकार रोखले जातील 
- विजेवर टॅक्सी चालणारे नागपूर हे देशातील पहिले शहर लवकरच ठरणार आहे
 
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या भाषणातील मुद्दे
- आम्ही देशाला डिजिटल करतो आहे, गरिबांपर्यंत खऱ्या अर्थाने योजना पोहोचत आहेत. हे या सरकारचे यश आहे. 
- नागपूरला आयटीचे केंद्र बनवायचं आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 
- मोबाइल क्षेत्रात क्रांती होत आहे, 72 नवीन कंपन्या आल्या. 12 कोटी नवीन मोबाइलचे उत्पादन झाले 
- डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारत आहे. दिल्लीतून निघालेला एक रुपयादेखील गरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे हे आमचे धोरण आहे