शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

विद्यार्थी, शिक्षकांच्या नात्यात दुरावा

By admin | Updated: July 12, 2014 23:10 IST

शिक्षकाविषयीचा आदर, दबदबा आणि भीती या सर्वच भावना हळूहळू लोप पावत असल्याचा निष्कर्ष लोकमतने केलेल्या पाहणीद्वारे समोर आला.

वाशिम : गुरुकुलाची परंपरा लाभलेल्या आपल्या समाजात शिक्षकाविषयीचा आदर, दबदबा आणि भीती या सर्वच भावना हळूहळू लोप पावत असल्याचा निष्कर्ष लोकमतने केलेल्या पाहणीद्वारे समोर आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी घडविण्याच्या व्यापक विचारांना तिलांजली देत केवळ विषयापुरती चाकोरी आखुण घेतली आहे. तर विद्यार्थ्यांनाही केवळ परिक्षेत गुण मिळविण्यासाठी शिक्षकांची निकड भासत आहे. यातूनच या नात्यामधील दुरावा दिवसागणिक वाढत चालला आहे.१२ जुलैला सर्वत्र गुरूपोर्णिमेचा उत्सव साजरा झाला. त्याच पृष्ठभूमिवर विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नात्यातील ओलाव्याची स्थिती जाणू घेण्यासाठी लोकमतने एक सर्व्हेक्षण केले. यामध्ये लोकमतच्या चमूने महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांशी संवाद साधला. या सर्व्हेक्षणात गुरू -शिष्यातील नात्यांची पकड काहीअंधी सैल झाल्याचे दिसून आले. वाढत्या विद्यार्थिसंख्येमुळं अनेक शाळांमध्ये दोन शिफ्टमध्ये अध्यापन चालतं. शिक्षक आपापल्या शिफ्टचा आणि विषयाचा विचार करतात; सर्वांगीण विद्यार्थिहिताचा विचार हळूहळू मागे पडत आहे, असा अनुभव आला. संस्कारक्षम वयात गुरुविषयी असलेला आदर पुढे क्रमश: घटत जातो ,असेही यातून पाहायला मिळाले. प्राथमिक शाळेत शिक्षक-विद्यार्थ्यांत नातं निर्माण होतं. गुरूची ओळख विद्याथ्यार्ला तेव्हा प्रथमच होत असल्यामुळं या कोवळ्या वयात या नात्यात ओलावा असतो. या वयात शिक्षकाशी जडलेलं नातं विद्यार्थी कायम जपतात. दहावी-बारावी पास झाल्यावर अनेक विद्यार्थी पहिल्या शिक्षकाला पेढे देतात. कुठेही भेटले, तरी आदरानं नमस्कार करतात. पूवीर्ची पाया पडण्याची पद्धत मागं पडली असली, तरी तोच आदर या शिक्षकाविषयी दिसतो.माध्यमिक शिक्षण घेताना ज्या विषयात रस असेल, त्या शिक्षकाशी हे नातं टिकून राहिल्याचा अनुभव येतो. बाकी विषय, विशेषत: अवघड विषय शिकविणार्‍या शिक्षकाशी व्यक्तिगत नातं निर्माण होत नसल्याचे सर्व्हेतून दिसून आले.