शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अधिवेशनाआधीच विरोधकांमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:34 IST

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचे चित्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पाहायला मिळाले. त्यामुळे सत्ताधारी निश्चिंत झाले आहेत. सरकारच्या कारभारात ‘झोल’ असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत केली.अधिवेशनाच्या आदल्या दिवशी प्रथेप्रमाणे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेते संयुक्त पत्रकार परिषदेस संबोधित करणार होते. मात्र,  इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आधी घ्यायचा की शरद पवारांचा यावरुन झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. विखे-पाटील यांनी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि जनता दल (युनायटेड) आदी पक्षांची तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे. बँकांकडे असलेल्या आकडेवारीच्या आधारे कर्जमाफी देणे शक्य आहे. परंतु, सरकारने आता अर्ज वाटप करुन शेतक-यांची पात्रता निश्चित करण्याचा घाट घातला आहे. कर्जमाफीची घोषणा करण्यास विलंब झाल्याने शेतक-यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. पण प्रत्यक्षात शिवरायांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मीलवरील स्मारक आणि अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजून पुढे गेलेले नाही. पण त्यांची नावे वापरून लोकांची दिशाभूल मात्र सुरूच असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. शेतक-यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालालला हमीभाव, नेवाळे येथील शेतकरी आंदोलनात पॅलेट गनचा वापर आदी प्रश्नावर सरकारला धारेवर धरू. ‘राज्य सरकारचा सगळा कारभार गोल, गोल आहे. त्यात मोठा झोल आहे.’ त्यामुळे सरकारवर जनतेचा भरोसा राहिला नाही, अशी टीका धनंजय मुंढे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत केली. ते एकत्र राहावेत ही टायपिस्टची इच्छा पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांमध्ये आम्ही फूट पाडलेली नाही. त्या फुटीचा आम्हाला फायदाही नको आहे. त्यांनी आयुष्यभर विरोधातच राहावे. आज दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवेदने माझ्याकडे पाठविली पण मजकूर अगदीच सारखा होता. म्हणजे ते एकत्र राहावेत ही टायपिस्टची इच्छा आहे, असा चिमटा त्यांनी काढला. विधिमंडळाचे सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भाजप, शिवसेनेसह सर्व घटक पक्ष चहापान कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजपा-शिवसेनचे मंत्री उपस्थित होते.