शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

वातावरणातील फरक विध्वंसक

By admin | Updated: May 14, 2017 05:28 IST

वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे;

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे; या गोष्टी आपल्याला विध्वंसाकडे घेऊन जात आहेत. ठरावीक काळानंतर पडणारा दुष्काळ, शहरासह देशभरातले वाढत जाणारे तापमान आणि मोठ्या प्रमाणातील प्रदूषणसुद्धा येऊ घातलेल्या विध्वसंकतेला तितकेच पूरक आहे, असे प्रतिपादन मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी ‘बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा’ या विषयावर आयोजित व्याखानात कृष्णानंद होसाळीकर बोलत होते. मुंबई विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, हवामानाच्या भयंकर परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आपणच सर्वत्र निसर्गाची हानी केली आहे. आपणच ग्लोबल वॉर्मिंग वाढवले आहे. मुंबईतली उष्णता वाढण्यामागेसुद्धा आपणच आहोत. आपण झाडे तोडली त्यात भर म्हणून सर्वांनी आपआपली घरे वातानुकूलित केली आणि बाहेरचे तापमान वाढवले. म्हणून शहरासह देशभरातील उष्णता वाढली आहे. २००२, २००५, २००९, २०१० आणि २००१६ ही आतापर्यंतची सर्वात उष्ण वर्षे होती. तर यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण होता.यंदा देशासह महाराष्ट्रात ९६ टक्के पाऊस पडेल. मुंबईत मान्सून कधी दाखल होईल, हे सध्या सांगता येणार नाही. वेधशाळेच्या पुढील अभ्यासानंतर मान्सूनबद्दलची माहिती येत्या काळात देण्यात येईल.मुंबईत तर हिवाळा नसतोच. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके दिवस मुंबईतल्या हवेत थोडासा गारवा असतो; त्यालाच आपण मुंबईकर हिवाळा मानतो.>यंदाचा अपेक्षित पाऊस कोकण आणि गोवा - ९६ टक्केमध्य महाराष्ट्र - ९७ टक्केमराठवाडा - ९९ टक्केविदर्भ - ९६ टक्के