शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वातावरणातील फरक विध्वंसक

By admin | Updated: May 14, 2017 05:28 IST

वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे;

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वातावरणात अचानक होणारे बदल, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारख्या गरमीचा अनुभव येणे, पावसाळ्याचा कालावधी बदलत असणे; या गोष्टी आपल्याला विध्वंसाकडे घेऊन जात आहेत. ठरावीक काळानंतर पडणारा दुष्काळ, शहरासह देशभरातले वाढत जाणारे तापमान आणि मोठ्या प्रमाणातील प्रदूषणसुद्धा येऊ घातलेल्या विध्वसंकतेला तितकेच पूरक आहे, असे प्रतिपादन मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी ‘बदलते हवामान आणि यंदाचा पावसाळा’ या विषयावर आयोजित व्याखानात कृष्णानंद होसाळीकर बोलत होते. मुंबई विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, हवामानाच्या भयंकर परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आपणच सर्वत्र निसर्गाची हानी केली आहे. आपणच ग्लोबल वॉर्मिंग वाढवले आहे. मुंबईतली उष्णता वाढण्यामागेसुद्धा आपणच आहोत. आपण झाडे तोडली त्यात भर म्हणून सर्वांनी आपआपली घरे वातानुकूलित केली आणि बाहेरचे तापमान वाढवले. म्हणून शहरासह देशभरातील उष्णता वाढली आहे. २००२, २००५, २००९, २०१० आणि २००१६ ही आतापर्यंतची सर्वात उष्ण वर्षे होती. तर यंदाचा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण होता.यंदा देशासह महाराष्ट्रात ९६ टक्के पाऊस पडेल. मुंबईत मान्सून कधी दाखल होईल, हे सध्या सांगता येणार नाही. वेधशाळेच्या पुढील अभ्यासानंतर मान्सूनबद्दलची माहिती येत्या काळात देण्यात येईल.मुंबईत तर हिवाळा नसतोच. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके दिवस मुंबईतल्या हवेत थोडासा गारवा असतो; त्यालाच आपण मुंबईकर हिवाळा मानतो.>यंदाचा अपेक्षित पाऊस कोकण आणि गोवा - ९६ टक्केमध्य महाराष्ट्र - ९७ टक्केमराठवाडा - ९९ टक्केविदर्भ - ९६ टक्के