शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

‘त्या’ भाषणामुळे दंगल झाली का?

By admin | Updated: April 14, 2017 02:19 IST

हिंदू राष्ट्र सेना (एचआरएस) धनंजय देसाई याने दाखल केलेली फेरविचार याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. देसाई याने केलेल्या चिथावणीखोर भाषणाला

मुंबई : हिंदू राष्ट्र सेना (एचआरएस) धनंजय देसाई याने दाखल केलेली फेरविचार याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. देसाई याने केलेल्या चिथावणीखोर भाषणाला २०१४मध्ये मुस्लीम तरुणाची करण्यात आलेल्या हत्येचा कट म्हणता येईल का, असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.मोहसीन शेख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय देसाई याने उच्च न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल केली. त्याची ही याचिका दाखल करून उच्च न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासा दिला आहे. २०१६ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने त्याचा आरोप मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला देसाई याने उच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे.देसाई याने केलेल्या भाषणामुळे देसाई आणि अन्य आरोपींनी हत्येचा कट रचल्याचे सिद्ध होते का? ते ही भाषणाच्या पाच महिन्यांनतर? असे प्रश्न न्या. ए. एम. बदार यांनी गुरुवारच्या सुनावणीत उपस्थित केले.२ जून २०१४ रोजी पुण्याच्या उन्नतीनगर येथे मोहसीन शेखवर २० जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, हडपसर येथे झालेल्या दंगलीमध्ये शेख याचा सहभाग होता. त्यामुळे देसाई यांनी चिथावणीखोर भाषण करत हिंदू युवकांनाही परिसरात हिंसाचार करण्यास प्रवृत्त केले. शेखवर हल्ला करताना संबंधित जमाव ‘धनंजयभाई जिंदाबाद’ अशा घोषणा करत होता. धनंजय देसाई यांच्या सूचनेवरूनच मुस्लिम तरुणावर हल्ला करण्यात येत असल्याचे जमावातील एक जण दुसऱ्याला सांगत असल्याचे एकाने ऐकले. त्याने तशी साक्ष पोलिसांना दिली आहे.तर देसाई यांच्या वकिलांनी देसाईचा शेखच्या हत्येत काहीही भूमिका नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. घटनेच्यावेळी देसाई तिथे नव्हता. त्यांनी २०१४ मध्ये भाषण केले होते आणि ही घटना जून महिन्यात घडली. पाच महिन्यानंतर या भाषणाचा संदर्भ घटनेशी लावला जाऊ शकतो का? असा प्रश्न देसाई यांच्या वकिलांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)