शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

‘त्या’ भाषणामुळे दंगल झाली का?

By admin | Updated: April 14, 2017 02:19 IST

हिंदू राष्ट्र सेना (एचआरएस) धनंजय देसाई याने दाखल केलेली फेरविचार याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. देसाई याने केलेल्या चिथावणीखोर भाषणाला

मुंबई : हिंदू राष्ट्र सेना (एचआरएस) धनंजय देसाई याने दाखल केलेली फेरविचार याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. देसाई याने केलेल्या चिथावणीखोर भाषणाला २०१४मध्ये मुस्लीम तरुणाची करण्यात आलेल्या हत्येचा कट म्हणता येईल का, असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.मोहसीन शेख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय देसाई याने उच्च न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल केली. त्याची ही याचिका दाखल करून उच्च न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासा दिला आहे. २०१६ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने त्याचा आरोप मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला देसाई याने उच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे.देसाई याने केलेल्या भाषणामुळे देसाई आणि अन्य आरोपींनी हत्येचा कट रचल्याचे सिद्ध होते का? ते ही भाषणाच्या पाच महिन्यांनतर? असे प्रश्न न्या. ए. एम. बदार यांनी गुरुवारच्या सुनावणीत उपस्थित केले.२ जून २०१४ रोजी पुण्याच्या उन्नतीनगर येथे मोहसीन शेखवर २० जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, हडपसर येथे झालेल्या दंगलीमध्ये शेख याचा सहभाग होता. त्यामुळे देसाई यांनी चिथावणीखोर भाषण करत हिंदू युवकांनाही परिसरात हिंसाचार करण्यास प्रवृत्त केले. शेखवर हल्ला करताना संबंधित जमाव ‘धनंजयभाई जिंदाबाद’ अशा घोषणा करत होता. धनंजय देसाई यांच्या सूचनेवरूनच मुस्लिम तरुणावर हल्ला करण्यात येत असल्याचे जमावातील एक जण दुसऱ्याला सांगत असल्याचे एकाने ऐकले. त्याने तशी साक्ष पोलिसांना दिली आहे.तर देसाई यांच्या वकिलांनी देसाईचा शेखच्या हत्येत काहीही भूमिका नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. घटनेच्यावेळी देसाई तिथे नव्हता. त्यांनी २०१४ मध्ये भाषण केले होते आणि ही घटना जून महिन्यात घडली. पाच महिन्यानंतर या भाषणाचा संदर्भ घटनेशी लावला जाऊ शकतो का? असा प्रश्न देसाई यांच्या वकिलांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)