शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दाऊदवर इतकी वाईट वेळ आली का?- राज ठाकरे

By admin | Updated: June 27, 2016 04:52 IST

खडसेंना फोन करावा, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली का, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खडसे-दाऊद फोन प्रकरणाची खिल्ली उडवली

मुंबई : पाकिस्तानातून स्वत:ची सारी यंत्रणा चालविणाऱ्या दाऊदने महाराष्ट्रात एकनाथ खडसेंना फोन करावा, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली का, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खडसे-दाऊद फोन प्रकरणाची खिल्ली उडवली. नुकतेच विलेपार्ले येथे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दाऊदचा कथित कॉल प्रकरण आणि स्वीय सहायकाच्या लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या संदर्भात बोलताना राज म्हणाले की, ‘आपल्याकडे कोणत्याही विषयावर चर्चा चालत राहते. दाऊद पाकिस्तानमधून स्वत:ची यंत्रणा संभाळतो. तो तिथून खडसेंना कशाला फोन करेल, एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का, आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्कवितर्क लावले जातात. सगळी मज्जा मज्जा चालली आहे,’ या शब्दांत राज यांनी या प्रकरणाची खिल्ली उडवली. महाराष्ट्रात मराठी तरुणांना आधी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर, उरलेल्या नोकऱ्या बाकीच्यांना दिल्या जाव्यात. स्थानिकांना प्राधान्य देण्याचा मुद्दा जागतिक स्तरावरही चर्चिला जातोय. स्थानिकांच्या मुद्द्यावरच इंग्लंडने युरोपियन संघाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आणखी अनेक देश तेच करतील, पण इकडे मी हा मुद्दा उचलला की, लगेच संकुचिततेचा ठपका ठेवला जातो, असे सांगत युपीएससी, एमएपीएससीत यश मिळवित अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज यांनी केले. (प्रतिनिधी)