शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी ‘संवाद पथक मोहीम’ !

By admin | Updated: January 14, 2017 01:02 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या मोहिमेची राज्य स्तरावर दखल.

संतोष वानखडेवाशिम, दि. १३- कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि कुपोषणासंदर्भात इत्थंभूत माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने राबविलेल्या गृहभेट संवाद मोहिमेची राज्य शासनाने दखल घेतली असून, आता ही मोहीम राज्यभर १२ ते २६ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे.कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. याशिवाय माता आणि किशोरवयीन मुलींनादेखील अनेक समस्या भेडसावतात. या विषयासंदर्भात कुटुंबीयांशी सुसंवाद साधून त्यांची परिस्थिती समजून घेणे, आजार होऊ नये म्हणून सतर्कता कशी बाळगावी, यासह आरोग्य शिक्षणाची माहिती देण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने १३ ते ३१ डिसेंबर २0१६ या दरम्यान गृहभेट संवाद मोहीम राबविली. या मोहिमेची दखल राज्य शासनाने घेतली असून, स्वतंत्र परिपत्रक काढून संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. महिला व बाल विकास विभागातर्फे राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, पोषण चळवळ अंतर्गत ही मोहीम राबवायची असल्याने, या मोहिमेचा शुभारंभ राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीपासून १२ जानेवारीला करण्यात आला. किशोरींचा आत्मसन्मान  जागविण्यासाठी, गर्भवती मातांच्या पोटी सुदृढ बाळ जन्मण्यासाठी, बाळाला स्तनपानाचा हक्क मिळवून देण्यासाठी, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी कुटुंबीयांशी सुसंवाद साधता यावा, म्हणून ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व ५ वर्षांंपर्यंतची मुले व मुली यांना पोषणाचे महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे याविषयी समाजामध्ये विशेषत कुटुंबामध्ये चर्चा होणे व त्यांची मानसिकता बदलविणे, आहारसंदर्भात समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करणे, माता व बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे कार्य या मोहिमेंतर्गत करावे लागणार आहे.कुपोषण, माता व किशोरवयीन मुलींच्या समस्या, पोषण आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, यासंदर्भात वाशिम जिल्हा परिषदेने डिसेंबर २0१६ मध्ये गृहभेटीतून कुटुंबीयांशी संवाद साधणारी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेतून अनेक बाबी समोर आल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. वाशिममधील या मोहिमेच्या धर्तीवर आता राज्य शासनाने ह्यसंवाद पथक मोहीमह्ण सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गतही कुटुंबीयांशी संवाद साधला जात आहे. - गणेश पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.