शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

मुंबईतही घडणार ‘संवाद’

By admin | Updated: July 30, 2014 00:31 IST

एचआयव्हीची वाटणारी भिती आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक दडपण दूर करण्यासाठी काम करणारी ‘संवाद’ हेल्पलाईन आता मुंबईतही जोमाने काम करताना दिसणार आहे.

मुंबई : असुरक्षित संभोग केल्यानंतर एचआयव्हीची वाटणारी भिती आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक दडपण दूर करण्यासाठी काम करणारी ‘संवाद’ हेल्पलाईन आता मुंबईतही जोमाने काम करताना दिसणार आहे. मुक्ता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या या हेल्पलाईनने याआधी पुणो, सोलापूर जिल्ह्यांसह बिहारसारख्या राज्यात लाखो लोकांचे समुपदेशन केले आहे.
गेल्या 9 वर्षात एचआयव्ही एड्सबाबत विविध प्रश्नांनी ग्रासलेल्या राज्यातील 1 लाख 35 हजार 791 जणांच्या समुपदेशनाचे काम संस्थेने केले आहे. तर बिहारमध्येही सुमारे 42 हजार नागरिकांनी या हेल्पलाईवर संपर्क साधल्याचे संस्थेने सांगितले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन्ही भाषेत हेल्पलाईनवरील समुपदेशक संपर्क साधणा:यांचे समुपदेशन करतात. 
गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील 6क्क् लोकांनी एचआयव्ही आणि एड्सबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईनवर कॉल केले. त्यामुळे आता मुंबईतही तळागाळातील लोकांर्पयत एड्स आणि एचआयव्हीबाबत जनजागृती करण्यासाठी संस्था काम सुरू करत असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मधु ओस्वाल-ठक्कर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, हेल्पलाईनवर वयोमानानुसार प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी आणि नुकत्याच लग्न झालेल्या तरुणांचे कॉल येण्याचे प्रमाण अधिक आहे. भावनेच्या आहारी किंवा नशेत असताना संभोग केल्यानंतर मनात भिती निर्माण होते. आपल्याला एचआयव्हीची लागण तर झाली नाही ना? म्हणून ही मंडळी शासनाच्या रूग्णालयांत जाऊन वेगवेगळ्य़ा चाचण्याही करतात. मात्र मनाची खात्री पटलेली नसते. अशा तरुणांचे समुपदेशन हेल्पलाईन करते. शिवाय थेट कॉल केलेल्या तरुणांनाही शासनाच्या नेमक्या कोणत्या विभागात कोणती चाचणी करण्याची गरज आहे, याचे मार्गदर्शन केले जाते.
पुण्यात शासकीय रूग्णालये, शाळा, महाविद्यालय याठिकाणी पोस्टर लावून, शिबिर घेऊन आणि पथनाटय़ाच्या माध्यमातून संस्था जनजागृती करत आहे. त्याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, आशा वर्कर आणि विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती केली. याच पद्धतीचा अवलंब करून मुंबईतही जनजागृती केली जाईल, असे संस्थेने सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्2क्13-14 या आर्थिक वर्षात राज्यातून 25 ते 4क् वयोगटातील तरुणांनी सर्वाधिक कॉल केल्याचे संस्थेने सांगितले. तरुणांचे कॉल करण्याचे प्रमाण हे 83 टक्के इतके आहे. 2क्क्5-क्6 साली हे प्रमाण 22 टक्के इतके होते. देशातील एचआयव्ही झालेल्यांची संख्या 24 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यात तरुणांची संख्या 31 टक्के इतकी आहे.
 
..तर एक मिस्ड कॉल द्या
च्कोणत्याही नागरिकाच्या मनात एचआयव्ही किंवा एड्सबाबत शंका असेल, तर त्यांनी हेल्पलाईनच्या 9527665566 या टोल फ्री क्रमांकावर एक मिस्ड कॉल देण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. 24 तासांच्या आत संस्थेचे समुपदेशक मिस्ड कॉल आलेल्या क्रमांकावर कॉल करून शंकेचे निराकरण करतात.