शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

धुळे - शहर हद्दवाढीबाबत संभ्रम कायम!

By admin | Updated: August 21, 2016 18:43 IST

महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २१ : महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़ तर दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी नवीन प्रस्ताव कधीच शासनाला सादर करण्यात आला असून शहर हद्दवाढीची घोषणा कधीही अचानकपणे केली जाऊ शकते, असे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़.महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शहर हद्दवाढीची प्रक्रिया दोन वर्षापूर्वी सुरू केली होती़ तत्पूर्वी प्रक्रिया संथगतीने सुरू होती मात्र दोन वर्षांपूर्वी शहर हद्दवाढीच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या़ मनपाचे तत्कालिन प्रभारी आयुक्त के़व्ही़धनाड यांच्या कार्यकाळात हद्दवाढीचा प्रस्ताव अजेंड्यावर आला़ हद्दवाढीच्या प्रस्तावात सुचविण्यात आलेली पाचपटीपेक्षा अधिक वाढ पाहून तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ देखील अवाक् झाले होते़ त्यानंतर चारवेळा बदल करून अंतिम प्रस्ताव तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अभिप्रायासह शासनाला सादर करण्यात आला होता़.

जिल्हाधिकारी मिसाळ यांनी पालिकेची परिस्थिती डोळयासमोर ठेवून केवळ चारच गावे हद्दवाढीत घेणे योग्य होईल, असा अभिप्राय दिला होता़ त्यानंतर आमदार अनिल गोटे यांच्या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांकडे फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली व त्या बैठकीत प्रस्तावित क्षेत्र वाढविण्याची मागणी आमदार गोटेंनी केली़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी क्षेत्र वाढवून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते़ मात्र त्यानंतर नवीन प्रस्तावाच्या गटांगळया सुरू आहेत़

संभ्रमावस्था कायम!मनपा प्रशासनाने प्रस्तावित १६ पैकी १५ गावे कायम ठेवली असून त्यात लळींग गाव वगळण्यात आले आहे तर सावळदे गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ नवीन नकाशे तयार करून मनपा प्रशासनाने ते जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केल्याची माहिती दिली असली तरी या बाबत दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही प्रस्ताव शासनाकडे गेला किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही़ तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी बदल झालेला प्रस्ताव आपण असेपर्यंत तरी शासनाला पाठविण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले तर नवनियुक्त जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी माहिती घेऊन सांगणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़ तर आमदार अनिल गोटे यांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर झाला असून त्यातील आवश्यक ते बदल देखील करण्यात आले आहेत़ आता कोणत्याही क्षणी शहर हद्दवाढीची अचानक घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती दिली़ त्यामुळे नेमकी स्थिती काय हा प्रश्न निर्माण झाला आहे़