शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

धुळे - शहर हद्दवाढीबाबत संभ्रम कायम!

By admin | Updated: August 21, 2016 18:43 IST

महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २१ : महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़ तर दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी नवीन प्रस्ताव कधीच शासनाला सादर करण्यात आला असून शहर हद्दवाढीची घोषणा कधीही अचानकपणे केली जाऊ शकते, असे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़.महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शहर हद्दवाढीची प्रक्रिया दोन वर्षापूर्वी सुरू केली होती़ तत्पूर्वी प्रक्रिया संथगतीने सुरू होती मात्र दोन वर्षांपूर्वी शहर हद्दवाढीच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या़ मनपाचे तत्कालिन प्रभारी आयुक्त के़व्ही़धनाड यांच्या कार्यकाळात हद्दवाढीचा प्रस्ताव अजेंड्यावर आला़ हद्दवाढीच्या प्रस्तावात सुचविण्यात आलेली पाचपटीपेक्षा अधिक वाढ पाहून तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ देखील अवाक् झाले होते़ त्यानंतर चारवेळा बदल करून अंतिम प्रस्ताव तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अभिप्रायासह शासनाला सादर करण्यात आला होता़.

जिल्हाधिकारी मिसाळ यांनी पालिकेची परिस्थिती डोळयासमोर ठेवून केवळ चारच गावे हद्दवाढीत घेणे योग्य होईल, असा अभिप्राय दिला होता़ त्यानंतर आमदार अनिल गोटे यांच्या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांकडे फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली व त्या बैठकीत प्रस्तावित क्षेत्र वाढविण्याची मागणी आमदार गोटेंनी केली़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी क्षेत्र वाढवून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते़ मात्र त्यानंतर नवीन प्रस्तावाच्या गटांगळया सुरू आहेत़

संभ्रमावस्था कायम!मनपा प्रशासनाने प्रस्तावित १६ पैकी १५ गावे कायम ठेवली असून त्यात लळींग गाव वगळण्यात आले आहे तर सावळदे गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ नवीन नकाशे तयार करून मनपा प्रशासनाने ते जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केल्याची माहिती दिली असली तरी या बाबत दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही प्रस्ताव शासनाकडे गेला किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही़ तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी बदल झालेला प्रस्ताव आपण असेपर्यंत तरी शासनाला पाठविण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले तर नवनियुक्त जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी माहिती घेऊन सांगणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़ तर आमदार अनिल गोटे यांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर झाला असून त्यातील आवश्यक ते बदल देखील करण्यात आले आहेत़ आता कोणत्याही क्षणी शहर हद्दवाढीची अचानक घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती दिली़ त्यामुळे नेमकी स्थिती काय हा प्रश्न निर्माण झाला आहे़