शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मध्वजारोहण म्हणजे सिंहस्थ पर्वाच्या प्रारंभाचा शंखध्वनी

By admin | Updated: July 12, 2015 03:27 IST

जेव्हा बृहस्पती (गुरू) आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात, तो काळ सिंहस्थ महाकुंभपर्व म्हणून मानला जातो. स्कंद पुराणातील वर्णनानुसार दक्षिण वाहिनी गोदावरी

- सतीश शुक्ल(अध्यक्ष श्री गंगागोदावरी पंचकोटी (पुरोहित) संघ)जेव्हा बृहस्पती (गुरू) आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात, तो काळ सिंहस्थ महाकुंभपर्व म्हणून मानला जातो. स्कंद पुराणातील वर्णनानुसार दक्षिण वाहिनी गोदावरी नाशिकमध्ये पंचवटीत असून, या पवित्र पर्वासाठी विश्वातील सर्व नद्या, सागर, परम तपस्वी ऋषी, महर्षी साधू-संत आणि ३३ कोटी देवता गोदावरी नदीच्या तीरावर वास्तव्यास येतात. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सिंहस्थ ध्वजारोहण संपन्न होत आहे. सिंहस्थ पर्वाला प्रारंभ होत आहे, याची उद््घोषणा करण्यासाठी धर्मध्वजारोहणाचे वेगळे महत्त्व आहे. ध्वजारोहण ही पुरातन परंपरा आहे. यंदाही गुरू ग्रह सिंंह राशीत प्रवेश करणार असून, १४ जुलै रोजी सकाळी ६.१६ वाजता या मुहूर्तावरच ध्वजारोहण होईल, तर सिंंहस्थ महापर्वाची सांगता ११ आॅगस्ट २०१६ रोजी होणार असून, त्यावेळी ध्वजावतरण होणार आहे.नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या वतीने ध्वजारोहण करण्याची मोठी परंपरा आहे. अत्यंत पुरातन परंपरेत साधू-महंत सहभागी होत असतात. रामकुंडावर गंगागोदावरीची दोन मंदिरे आहेत. मगर आणि अमृत कुंभ असलेला फलक हा ७ बाय ३ फुटांचा असून, तो रामकुंडावरच वस्त्रांतरगृहाखाली असलेल्या गंगागोदावरी मंदिरासमोर उभारला जातो. तसेच दुसऱ्या गंगागोदावरी मंदिरावर १५ बाय साडेचार फूट आकाराचा ध्वज उभारण्यात येणार आहे. या ध्वजाची वैशिष्टे आहेत. त्याचा आकार, त्यावरील अमृत कुंभ, सिंह आणि मगर अशा अनेकांची वैशिष्टे सांगण्यात येतात. धर्मध्वज निर्माण करताना जेवढे उभे आडवे तंतू ध्वजनिर्मितीत वापरले जातात, त्या संख्येनुसार हजारो वर्षे यजमानास स्वर्ग फल प्राप्त होते, असे मानले जाते. या दिव्य धर्मध्वजाची प्रदक्षिणा करतात, त्यांना जीवनातील सकल ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच ध्वजाची संस्थापना केलेल्या ठिकाणची माती (रज:कण) जे भक्तिभावाने धारण करतात, त्यांच्या सप्तजन्माच्या पातकांचा नाश होतो, असे मानले जाते. असे ध्वजारोहण ज्या भूमीवर केले जाते त्या राष्ट्रावर आपत्ती येत नाही, असे मानले जाते.