शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

धनगर आरक्षण आता केंद्राच्याच हातात

By admin | Updated: January 23, 2015 01:22 IST

धनगर समाजाला आरक्षण देणे केंद्र सरकारच्याच हाती असून त्यांनी काही निर्णय घेतला तरच हे आरक्षण मिळेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

पुणे : धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एक नसल्याचे खुद्द राज्याचे आदिवासी विकासमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य शासनानेच हा प्रश्न निकाली काढला असून आता धनगर समाजाला आरक्षण देणे केंद्र सरकारच्याच हाती असून त्यांनी काही निर्णय घेतला तरच हे आरक्षण मिळेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. धनगर समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यासाठी आघाडी सरकार सकारात्मक होते. मात्र, हे आरक्षण देताना कायदेशीर बाबींचा विचार करून कोणत्याही अडचणी येणार नाहीत, यासाठी सरकारकडून सर्व खबरदारी घेण्यात येत होती. अनुसुचित जमातीमधून आरक्षण देताना काही आदिवासी नेत्यांचा विरोध असल्याने आदिवासी नेते आणि आरक्षण समितीमध्ये समन्वय बैठका सुरू होत्या. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सत्तेत आल्यानंतर लगेच आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र, सत्ता येऊन दोन महिने उलटले तरी, अद्याप आरक्षण मिळालेले नाही, असे ते म्हणाले.भ्रष्टाचार आणि महागाईचा काँग्रेसला फटकागेल्या १५ वर्षांत महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा वेग देशात सर्वाधिक होता. सर्वसामान्यांसाठी सरकारने चांगले निर्णयही घेतले होते. मात्र, त्यानंतरही जनतेने कॉंग्रेसला नाकारण्यामागे महागाई आणि भ्रष्टाचार हे दोन घटक जबाबदार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.