शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

सरकार दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

By admin | Updated: March 8, 2016 16:47 IST

शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ८ - सर्व आघाडयांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. जनतेला प्यायला पाणी नाही, जे साधे पाणीही  देऊ शकत नाहीत अशा सरकारच्या चहापानाला कशाला जायचे ?  म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
 
बुधवारपासून सुरु होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे गटनेते यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.  या पत्रकार परिषदेत सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका करण्यात आली. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे. बाकी राज्यात चांगला पाऊस पडूनही दुष्काळ जाहीर झाला, राज्यात का होत नाही असा सवाल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विचारला आहे. 
 
मंत्र्यानी मराठवाड्याचे दुष्काळी पर्यटन केले; जगलरी शब्दाचा खेळ करणारे हे सरकार आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना दिलेले 500 कोटी रु पूर्वीच्याच जाहीर 2 हजार कोटी पैकी आहेत, यात नवीन काही नाही. कापसाचा पीक विमा आणि अनुदानाबाबत हि दळभद्री निर्णय घेतले जात आहेत. 4 महिन्यांपासून चारा छावण्यांची बिले दिले नाहीत. 50 कोटींनी काही होणार नाही. बीड, लातूरमध्येच 60 कोटी पेक्षा जास्त देणे आहे असं धनंजय मुंडे बोलले आहेत. 
 
राज्यात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. राजकीय पक्षांची गुंडगिरी दिसत आहे. पोलिसच सुरक्षित नाही आहेत. डान्स बार बंदीबाबत खायचे अन दाखवायचे दात वेगळे आहेत. बार मालक आणि सरकार यांच्यात मिलिभगत आहे. पहिल्याच आठवड्यात डान्सबार बंदीचा कायदा आणून दाखवा असं आव्हान धनंजय मुंडेंनी केलं आहे. 
 
मुंबई महापालिकेतील मागील 10 वर्षातील  कामाचे कॅग मार्फत विशेषलेखापरीक्षण करा. मेक इन इंडिया म्हणजे भुलभूलय्या आहे. गुंतवणुकीचे दावे खोटे आहेत, औद्यागिक घसरण झाली. किती गुंतवणुक आली याची श्वेतपत्रिका काढावी. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण खोळंबत ठेवले आहेत. मंत्र्याचे घोटाळे मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातले, शेतक-यांना पीए मार्फत मारहाण करणा-या शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.