शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सरकार दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

By admin | Updated: March 8, 2016 16:47 IST

शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ८ - सर्व आघाडयांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. जनतेला प्यायला पाणी नाही, जे साधे पाणीही  देऊ शकत नाहीत अशा सरकारच्या चहापानाला कशाला जायचे ?  म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
 
बुधवारपासून सुरु होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे गटनेते यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.  या पत्रकार परिषदेत सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका करण्यात आली. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे. बाकी राज्यात चांगला पाऊस पडूनही दुष्काळ जाहीर झाला, राज्यात का होत नाही असा सवाल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विचारला आहे. 
 
मंत्र्यानी मराठवाड्याचे दुष्काळी पर्यटन केले; जगलरी शब्दाचा खेळ करणारे हे सरकार आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना दिलेले 500 कोटी रु पूर्वीच्याच जाहीर 2 हजार कोटी पैकी आहेत, यात नवीन काही नाही. कापसाचा पीक विमा आणि अनुदानाबाबत हि दळभद्री निर्णय घेतले जात आहेत. 4 महिन्यांपासून चारा छावण्यांची बिले दिले नाहीत. 50 कोटींनी काही होणार नाही. बीड, लातूरमध्येच 60 कोटी पेक्षा जास्त देणे आहे असं धनंजय मुंडे बोलले आहेत. 
 
राज्यात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. राजकीय पक्षांची गुंडगिरी दिसत आहे. पोलिसच सुरक्षित नाही आहेत. डान्स बार बंदीबाबत खायचे अन दाखवायचे दात वेगळे आहेत. बार मालक आणि सरकार यांच्यात मिलिभगत आहे. पहिल्याच आठवड्यात डान्सबार बंदीचा कायदा आणून दाखवा असं आव्हान धनंजय मुंडेंनी केलं आहे. 
 
मुंबई महापालिकेतील मागील 10 वर्षातील  कामाचे कॅग मार्फत विशेषलेखापरीक्षण करा. मेक इन इंडिया म्हणजे भुलभूलय्या आहे. गुंतवणुकीचे दावे खोटे आहेत, औद्यागिक घसरण झाली. किती गुंतवणुक आली याची श्वेतपत्रिका काढावी. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण खोळंबत ठेवले आहेत. मंत्र्याचे घोटाळे मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातले, शेतक-यांना पीए मार्फत मारहाण करणा-या शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.