शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

धनगर आरक्षणावरून गदारोळ

By admin | Updated: March 11, 2016 04:06 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विधान परिषदेचे काम दोनदा तहकूब करावे लागले

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विधान परिषदेचे काम दोनदा तहकूब करावे लागले. धनगर आक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचे धोरण बनवाबनवीचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. प्रश्नोत्तराच्या तासात मुंडे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. सत्ता मिळाली तर पहिल्या महिन्यात धनगर आरक्षणाचा निर्णय करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सत्तेत आल्यावर मात्र त्यांनी धनगर समाजाला वाऱ्यावर सोडले. गेली दोन वर्षे प्रत्येक अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होत असून, सरकार मात्र सर्वेक्षण आणि अहवालाचीच भाषा करीत असल्याचे मुंडे म्हणाले. धनगर आरक्षणाबाबत महाधिवक्त्यांनी सरकारला दिलेला अहवाल सभागृहासमोर ठेवावा, अशी मागणीही मुंडे यांनी या वेळी केली. यावर धनगर समाजाला आरक्षण देण्याचीच सरकारची भूमिका आहे. मात्र, हे आरक्षण देताना त्रुटी राहू नये यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी स्पष्ट केले.त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला संशोधनाचे काम देण्यात आले आहे. डिसेंबर २०१७पर्यंत त्यांच्याकडून अहवाल अपेक्षित असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सवरा यांनी सांगितले. मात्र, धनगर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका सातत्याने बदलत आहे. २०१७च्या शेवटी टाटांचा अहवाल आल्यानंतर आरक्षण कधी देणार, असा सवाल करत सरकार फसवणूक करीत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. सवरांची भूमिका काय?यापूर्वीच्या अधिवेशनात आदिवासी मंत्री सवरा यांनी धनगरांना अनुसूचित जमातीच्या सवलती देता येणार नसल्याचे सांगितले होते. आता सवरांची भूमिका काय आहे, असा प्रश्न सुनील तटकरे यांनी विचारला. यावर भूमिकेत बदल होण्याचे कारण नाही. धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचे सवरा यांनी सांगितले.